शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
6
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
7
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
8
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
9
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
10
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
11
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
12
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
13
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
14
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
15
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
16
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
17
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
18
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
19
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
20
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारकडून कृषी संस्कृतीलाच हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST

जालना : भारताची खरी संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. असे असताना शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणाऱ्या केंद्र सरकारकडून त्यांच्यावर अन्याय ...

जालना : भारताची खरी संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. असे असताना शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणाऱ्या केंद्र सरकारकडून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. नवीन तीन कायदे त्यांच्यावर लादून त्यांची दिशाभूल केली जात आहे. हे थांबविण्यासाठी केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, असा सूर बीड जिल्ह्यातील वडवणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये मान्यवरांनी व्यक्त केला. या वेबिनारमध्ये इंडियन ॲग्रीकल्चर ॲक्ट्स ॲण्ड ॲक्ट्स हा विषय ठेवण्यात आला होता. या वेबिनारमध्ये जालना जिल्ह्यातून अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. मारुती तेगमपुरे हे सहभागी झाले होते. गेल्या महिनाभरापासून कडाक्याच्या थंडीत बळीराजा हजारोंच्या संख्येने दिल्लीत तळ ठोकून आहे; परंतु सरकारकडून त्यांच्या मागण्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. ही बाब शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणाऱ्या सरकारला शोभत नसल्याचे सांगण्यात आले. जे तीन कायदे केले आहेत ते करत असताना बहुमताच्या जोरावर कायदे मंजूर करून त्यावर सविस्तर चर्चा न करता कोरोना काळातही या कायद्यांच्या मंजुरीसाठी लोकसभा आणि राज्यसभेचे अधिवेशन बोलावून त्यात हे कायदे रेटून नेले. त्यामुळे ते कायदे रद्द होणे हाच एकमेव पर्याय उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.

आजघडीला कृषी उत्पन्न बाजार समिती हा पर्याय दर्शविला जात आहे; परंतु प्रत्यक्षात देशात ४२ हजारांपेक्षा अधिक बाजार समित्यांची आवश्यकता असताना देशात केवळ ४४७७ बाजार समित्या आहेत. या बाजार समित्यांत केवळ सहा टक्केच व्यवहार होतात. अन्य ९४ टक्के व्यवहार हे बाहेर होतात. ८६ टक्के शेतकरी हे केवळ जिल्हांतर्गतच आपल्या मालाची खरेदी- विक्री करतात.

देशाचा विचार केल्यास ६६ टक्के शेतकऱ्यांकडे एक हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे. तर १८ टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर जमीन आहे. तर ०.८ टक्के शेतकऱ्यांकडे १८ हेक्टरपेक्षा सरासरी जास्त जमीन आहे. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी आम्ही करू, अशी वल्गना करून हे सरकार सत्तेवर आले; परंतु त्यांनीही काँग्रेसच्याच पावलावर पाऊल ठेवत या आयोगाला कागदोपत्रीच ठेवले, हे विशेष.

चौकट

कृषीसाठी २१ दिवसांचे विशेष अधिवेशन व्हावे

देशात शेतकऱ्यांच्या अनेक गंभीर समस्या आहेत. यासाठी संसदेचे २१ दिवसांचे अधिवेशन बोलावून त्यात शेतकरी आत्महत्या, सिंचन वाढ, भविष्यातील शेतीच्या गरजा आणि त्यावरील उपाय, जैव तंत्रज्ञान यासह अन्य महत्त्वपूर्ण विषयांवर लोकसभा आणि राज्य सभेच्या खासदारांनी चर्चा करून एक ठोस असा कृती कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी केल्यासच शेतकऱ्यांचे दारिद्र्यातील खितपत जिणे सुधारू शकते.

-मारुती तेगमपुरे,

अर्थशास्त्र विभागप्रमुख,

गोदावरी महाविद्यालय, अंबड