शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

मतदार दिनातून लोकशाही बळकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 12:53 AM

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शनिवारी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भारत हा लोकशाही प्रधान देश असून, या देशात निवडणुकांच्या माध्यमातून आपण लोकशाही अधिक बळकट करतो. तरुणांमध्ये लोकशाहीचे बिजारोपण करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस महत्वाची भूमिका बजावतो, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शनिवारी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंजली कानडे, जिल्हा पुरवठा अधिकारी बसैय्ये, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, गटशिक्षणधिकारी विठ्ठल जायभाये, पोलीस निरीक्षक निशिकांत पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी देवडे यांची उपस्थिती होती.परळीकर म्हणाले, शिक्षकांनी शाळेत विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक शालेय वयात केल्यास निश्चितच आगामी काळात लोकशाही अधिक बळकट होईल व यातून मतदानाची टक्केवारी वाढेल. यावेळी जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, डाटा एंट्री आॅपरेटर, निबंध, चित्रकला, रांगोळी स्पर्धेत बक्षिस प्राप्त विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनाची प्रतिज्ञा देण्यात आली.प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंजली कानडे यांनी गांधी चमन येथून हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, विद्यार्थिंनी, पोलीस बँड पथक, एस.आर.पी.एफ.चे जवान आदींनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :democracyलोकशाहीVotingमतदानSocialसामाजिक