शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘आॅन दी स्पॉट’ पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 12:05 AM

मंगळवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील टंचाई आढावा बैठक घेऊन अधिकारी, कर्मचा-यांची चांगलीच कानउघडणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने बळीराजा हैराण आहे. शेतमजूरांच्या हाताला कामे नाहीत, त्यातच पाणीटंचाईने रौद्ररूप धारण केले आहे. असे असतानाही गाव पातळीवरील अधिकारी, कर्मचारी हे चलता है धोरण स्वीकारत असल्याने याची दखल घेत मंगळवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील टंचाई आढावा बैठक घेऊन अधिकारी, कर्मचा-यांची चांगलीच कानउघडणी केली.जालना जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत ६१ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपासह रबी हंगामही शेतक-यांच्या हातातून गेल्याने यंदा पाणीटंचाईसह अन्नधान्याची टंचाईही जाणवणार आहे. त्यातच आता साधारणपणे जूनपर्यंत शेतीत कुठलेच काम नसल्याने मजुरांवर स्थलांतराची वेळ येत आहे. त्यामुळे मजुरांना त्यांच्या गावातच हाताला कामे उपलब्ध व्हावीत या हेतूनेमहाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त कामे हाती घेण्याची गरज आहे.जिल्ह्यात गोदावरी नदीचा किनारा सोडल्यास अन्य तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. भोकरदन, जाफराबाद, जालना, बदनापूर आणि मंठा तालुक्यांचा यात विशेष करून समावेश होतो.त्यामुळे या तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनाने जातीने लक्ष घालण्याची गरज असल्याची मागणी शेतकरी, शेतमजूरतसेच लोकप्रतिनिधींनी यापूर्वीच झालेल्या आढावा बैठकांमधून केली आहे.एक तलाठी निलंबितदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बिनवडे यांनी अंबड येथे अंबड आणि घनसावंगी तालुक्याची बैठक घेतली. यावेळी त्यांनी टंचाईचा आढावा घेतला. याच बैठकीत रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावाही घेण्यात आला. त्या ज्या ग्रामपंचायतींमध्ये एकही काम सुरू नाही अशा ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांना दिले. तसेच चाराटंचाई, पाणंद रस्ते, स्वच्छता अभियान आणि अन्य महत्वाच्या मुद्यावर जिल्हाधिका-यांनी माहिती जाणून घेतली. सजावर न राहणाºया तलाठ्यांच्या वारंवार येणा-या तक्रारीवरून एका तलाठ्यास निलंबित करण्याचा निर्णय बैठकीतच घेण्यात आला.तालुकानिहाय टंचाई बैठकादुष्काळाची पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्हाधिकारी बिनवडे यांनी जिल्ह्यातील आठही तालुक्यांच्या संयुक्त बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार मंगळवारी अंबड आणि घनसावंगी तालुक्याची बैठक पार पडली. बुधवारी परतूर आणि मंठा तर गुरूवारी जालना आणि बदनापूर तालुक्यांच्या बैठका होणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात देखील आढावा बैठक घेणार आहेत.मठपिंपळगाव : अंबड तालुक्यातील आलमगाव येथे जलयुक्त शिवार अभियान २०१७-१८ अंतर्गत झालेल्या कंम्पार्टमेंन्ट बंडींग (जमिनीवर बांध टाकणे) कामाची पाहणी मंगळवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केली.यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी महेंकर, अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार किशोर देशमुख, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे, मंडळ अधिकारी गाडेकर, कृषी सहायक कीर्तीकर, सरपंच अशोक भिसे, ग्रामसेवक एन.डी.खरात, तलाठी खेडेकर, देविदास शेळके, कौतुक पवार, रामेश्वर गोंटे, गोकुळ खरात, सुभाष शेळके, शिवाजी शेळके, रोजगार सेवक हनुमान भारती, कुंभारी उगले यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :droughtदुष्काळcollectorजिल्हाधिकारीwater shortageपाणीटंचाई