शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

दमदार पावसामुळे पेरणीपूर्व कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:29 AM

पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची लगबग सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमागील दोन दिवस जिल्ह्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची लगबग सुरू केली आहे. विशेषत: उकाड्यापासूनही काही प्रमाणात सुटका झाली आहे. असे असले तरी पेरणीसाठी आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.रविवारी जालना शहरासह परिसरात ढगाळ वातावरण होते.वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी परिसरात शनिवारी दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. मागील पंधरा दिवसांपासून परिसरात कडक ऊन तापत होते. समाधानकारक पाऊस झाल्याने या भागातील काही शेतक-यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.दुष्काळामुळे शेतक-यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मृग नक्षत्र सुरु होवूनही पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. शनिवारी सायंकाळी वालसावंगी, धावडा, पारध, शेलूद, वडोद तांगडा, वाडी, पद्मावती परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतक-यांनी मका, कपाशी, मूग सोयाबीनची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. यंदा पाऊस उशिरा आल्याने बहुतांश शेतक-यांची धूळ पेरणी वाया गेली आहे. दोन दिवसापूर्वी केलेली पेरणी पावसामुळे साधल्याने समाधान व्यक्त होत आहे. पाण्याअभावी उन्हाळी मिरचीचे पीक धोक्यात आले होते. या पावसामुळे मिरचीचे पीक वाचले आहे. रविवारी आठवडी बाजार भरतो. मात्र, पाऊस पडल्याने गावातील शेतकरी कुटुंबातील शाळकरी मुलांसह सर्वच सदस्यांनी शेती कामासाठी शेतात धाव घेतली. त्यामुळे बाजारात नागरिकांची गर्दी कमी दिसत होती.राजूर : प्रदीर्घ विश्रांतीनंतर राजूरसह परिसरात शनिवारी सायंकाळी समाधानकारक भीज पाऊस झाला. त्यामुळे सुखावलेल्या शेतकºयांनी रविवारी चाढ्यावर मूठ धरत पेरणीची लगबग सुरू केल्याचे चित्र राजूर परिसरात दिसून आले.पावसाअभावी कपाशी लागवडीसह पेरण्या खोळंबल्या होत्या. दुष्काळाच्या चटक्याने त्रस्त असलेले शेतकरी पावसाने पाठ फिरवल्याने हैराण झाले होते. चातक पक्षाप्रमाणे शेतकरी पावसासाठी वाट पाहात होते. अखेर शनिवारी सायंकाळी राजूरसह परिसरात पावसाने हजेरी लावली. पेरणी योग्य पाऊस झाल्याने राजूरसह परिसरातील शेतक-यांनी खरीप पेरणीची लगबग सुरू केली आहे. रविवारी सकाळीच शेतक-यांनी शेतीचा रस्ता धरला. या भागात कपाशी लागवडीसह मूग, उडीद, मकाच्या पेरणीला सुरूवात केली. शेतकरी पेरणीच्या कामाला लागल्याने रविवारी आठवडी बाजारच्या गर्दीवर मोठा परिणाम दिसून आला.राजूरचा आठवडी बाजार तालुक्यात सर्वात मोठा असतो. पंचक्रोशितील सुमारे तीस ते पस्तीस गावातील नागरिक बाजारला हजेरी लावतात. परंतू शनिवारी रात्री जोरदार पाऊस पडल्याने अनेकांनी बाजारात गर्दी करण्यापेक्षा शेतात जाणे पसंत केले. त्यामुळे आठवडी बाजारातील गर्दी कमी होऊन, येथील आर्थिक उलाढालीवरही परिणाम झाला होता.केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरात शनिवारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतक-यामध्ये उत्साह संचारला आहे. या भागातील शेतक-यांनी खरिपाच्या पेरणीची लगबग सुरु केली आहे.शनिवारी मृग व आद्रा नक्षत्राचा जोड होता. या जोडावर पावसाचे पेरणीयोग्य आगमन झाले. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या मार्गी लागणार असल्याचे दिसत आहे. रविवारी शाळेला सुटी असल्याने शेतकरी आपल्या मुलांसह शेतीमशागतीच्या कामी लागले होते. पाऊस नसल्याने गत अनेक दिवसांपासून खरिपाच्या पेरण्या खोंळबल्या होत्या. शनिवारच्या पावसाने पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला. ज्या शेतक-यांनी धुळपेरणी केली होत्या त्या देखील सार्थकी लागल्या आहेत.

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी