शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

उन्हापासून थंडावा मिळविण्यासाठी पोहायला गेलेल्या भावंडांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 6:51 PM

एकाच कुटूंबातील दोन मुलांचा दुदैर्वी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजूर (जालना ) : शेत तलावात पोहायला गेलेल्या दोन १६ वर्षीय युवकांचा तलावात बुडून करूण अंत झाल्याची दुदैर्वी घटना भोकरदन तालुक्यातील चांधई ठोंबरी येथे सोमवारी दुपारी दोन  वाजेच्या सुमारास घडली. एकाच कुटूंबातील दोन मुलांचा दुदैर्वी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

चांधई ठोंबरी येथील प्रकाश रामभाऊ वाघमारे यांच्या गट क्रमांक २४४ मधील शेतात शेत तलाव तयार करण्यात आलेला आहे. सोमवारी दुपारी त्यांचा मुलगा आकाश प्रकाश वाघमारे (१६), गौरव प्रभु वाघमारे (१६) हे दोघे भावंड अन्य मित्रांसह शेत तलावात पोहायला गेले होते. त्यांनी तलावात खाली- वर ऊतरण्यासाठी ठिबकची नळी लावलेली होती. यामध्ये आकाशला पोहोता येत होते. तर गौरव पोहने शिकत होता. दोघेही नळीच्या मदतीने पाण्यात ऊतरले. गौरवला पोहोता येत नसल्याने तो पाण्यात गटांगळया खावू लागला. आकाशने त्याला धरून ठिबकच्या नळीने वर येण्याचा प्रयत्न केला मात्र नळी तुटल्याने दोघांच्या जीवनाची दोरी तुटली. 

यामधे गौरवने आकाशला मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाले. तलावाच्या वर असलेल्या दोन ते तिन मित्रांनी दोघे पाण्यात बुडत असल्याचे पाहून घाबरून तेथून पळ काढला.  मुले पळत सुटल्याने आसपासच्या नागरिकांनी विचारणा केली असता, त्यांनी सदर घटना सांगीतली. काही ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेवून दोन्ही मुलांना वर काढले. परंतु तो पर्यंत त्या दोघांचाही करूण अंत झाला होता. एकाच कुटूंबातील दोन मुलांचा करूण अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात होती. ऊत्तरीय तपासणीसाठी दोघांचे मृतदेह राजूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :JalanaजालनाDeathमृत्यूWaterपाणीagricultureशेती