शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

दु:ख इथले संपले नाही...बॉण्ड व बकऱ्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 1:14 AM

आत्महत्या होताच आनेक अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी संतोषचे घर गाठून त्याच्या परिवाराचे सांत्वन केले. पण घटना होऊन आज ६ महिने झाले तरी संतोषच्या परिवाराला अद्याप एका पैशाचीही शासकीय मदत मिळालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : कोरडवाहू ६ एकर जमीन. त्यात सहा लहान मुले, पत्नी व म्हातारी आई. सततची नापिकी व दुष्काळाने शेतात फारसे पिकत नव्हते. तरीही तो संसाराचा गाढा कसाबसा ओढत होता. मात्र, आता दिवसेंदिवस त्याचे देणेघेणे वाढतच चालले होते. लोकं वसुलीसाठी घरी चकरा मारू लागले. खोटं तरी किती दिवस बोलणार. अखेर १ नोव्हेंबर च्या रात्री त्याने सर्व कुटुंबीय झोपी गेल्यानंतर स्वत:च्या गळ्याभोवती फास आवळला. पत्नीसह आठ जणांचा त्याचा परिवार क्षणात उघड्यावर आला.ही व्यथा आहे जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी संतोष सोनसाळे यांच्या कुटुंबाची. ३१ वर्षीय संतोषने आत्महत्या करुन स्वत:ला दु:खाच्या खाईतून मुक्त केले असले तरी, त्याच्या मागे राहिलेल्या परिवार जणांना त्याने कायमचे दु:खात लोटले आहे. आत्महत्या होताच आनेक अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी संतोषचे घर गाठून त्याच्या परिवाराचे सांत्वन केले. पण घटना होऊन आज ६ महिने झाले तरी संतोषच्या परिवाराला अद्याप एका पैशाचीही शासकीय मदत मिळालेली नाही.आपले वडील महादू बकाल, दीर रामकिसन सोनसाळे आदींच्या मदतीने मयत संतोषची पत्नी संगीता आपल्या वृध्द सासूसह सहा लहान मुलांचा सांभाळ करीत आहेत. शेतवस्तीवर राहणा-या संगीताला स्वत:चे पक्के घरही नाही. कुडाच्या झोपडीत शासकीय मदतीची वाट पाहत हे कुटुंब सध्या दिवस काढत आहे. जे खाजगी देणे - घेणे होते, त्यांच्या वसुलीसाठी तगादे सुरू आहेत. तेवढे बँकेचे कर्ज तरी माफ झाल्याने मोठा आधार मिळाल्याचे संगीताने बोलून दाखविले. दुष्काळामुळे हाताला काम नाही. छोटया लेकरांना घरी सोडून कामालाही जाता येत नाही. आता कसे जगावे, हा प्रश्न आहे. त्यामुळे शासकीय मदतीकडे सर्व लक्ष आहे.कळण्यापूर्वीच मुले अनाथ झालीआॅन दी स्पॉट रिपोर्ट घेण्यासाठी शनिवारी मयत संतोष सोनसाळेच्या शेतवस्तीवर भेट दिली असता चार निरागस बालके खेळत होती. पहिल्या तीन मुली झाल्यानंतर संतोषच्या पत्नीने चौथ्यांंदा एकाच वेळी तिळ्यांना जन्म दिला होता. ब्रह्मा, विष्णू, महेश अशी नावे असलेली ही तिघे चिमुकली मुले वडील कळण्यापूर्वीच अनाथ झाली. मोठी मुलगी रुपाली ५ वीत आहे. सुट्या लागल्याने रूपाली व शीतल आजोळी गेल्या होत्या. ४ थी तील दीपाली आपल्या भावंडांना खेळवत होती. महादू बकाल हे लेकीसाठी घरून गहू- शाळू घेऊन नेमकेच आले होते. मदत म्हणून मिळालेल्या बक-यांवरच आता गुजराण सुरू असल्याचे सांगण्यात आले.मयत संतोष सोनसाळेंच्या कुटुंबियांना खा. सुप्रिया सुळे यांनी चार बक-या देऊन मदत केली होती. आता या चार बक-यांना प्रत्येकी एक पिलू झाल्याने बक-या चारच्या आठ झाल्या आहेत. तर जि. प. सदस्य शालिकराम म्हस्के यांनी तिघी मुलींच्या नावे प्रत्येकी ११ हजार रुपये बँकेत ठेव करून बॉन्ड कुटुंबियांच्या सुपूर्द केले होते. मदतीच्या रुपात मिळालेल्या बक-या व बॉन्ड हाच काय तो आज संगीताबाईंचा जगण्याचा आधार आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याGovernmentसरकारSocialसामाजिक