शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

महसूल, पोलीस खात्यात लाचखोरांचे प्रमाण अधिक - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:41 IST

जालना : सरकारी नोकरीसाठी कठोर परिश्रम घेणारे तरुण खुर्चीवर बसताच पैशांच्या मागे लागतात. पैशांच्या मोहापायी ते सर्वसामान्यांकडून लाचेची मागणी ...

जालना : सरकारी नोकरीसाठी कठोर परिश्रम घेणारे तरुण खुर्चीवर बसताच पैशांच्या मागे लागतात. पैशांच्या मोहापायी ते सर्वसामान्यांकडून लाचेची मागणी करतात. असाच पैशांचा मोह न आवरणारे ६८ जण तीन वर्षांत लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. यात ५१ ते ६० वर्षे वयोगट असलेल्या २६ लोकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

लाच घेणाऱ्यांमध्ये महसूल व पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी अग्रेसर आहेत. मागील तीन वर्षांत महसूल खात्यातील १२ तर पोलीस खात्यातील ९ जण लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यापाठोपाठ जिल्हा परिषद कार्यालयाचा क्रमांक लागतो. मागील काही दिवसांपासून पैसे घेऊन कामे करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लाच घेताना अनेक जण एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.

मागील तीन वर्षांत आम्ही ५१ ते ६० वयोगटातील २६ जणांना लाच स्वीकारताना अटक केली आहे. त्यातच ३० वर्षांच्या आतील आरोपींचीही संख्या वाढली आहे. हे कारवायांवरून दिसून येत आहे. परंतु, आरोपी कोणताही असो, तक्रार आली की, त्याला ताब्यात घेतले जाईल. मागील तीन वर्षांत एसीबीने तब्बल ६८ लोकांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई सुरूच राहील.

- रवींद्र निकाळजे, उपपोलीस अधीक्षक, जालना

उतरत्या वयातील सरकारी बाबूंना सर्वाधिक पैशाचा मोह

जालना येथील लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईत ५१ ते ६० वयातील सर्वाधिक सरकारी बाबूंनी तीन वर्षांत लाच स्वीकारली आहे. २०१९ मध्ये उतरत्या वयातील १४ जणांनी लाच घेतली.

तर २०२० मध्ये १२ जणांना बेड्या ठोकल्या. २०२१ मध्ये एकाही व्यक्तीने लाच स्वीकारली नाही. त्यानंतर ३१ ते ४० वयोगटातील सरकारी बाबू लाचेची मागणी करतात. या वयोगटातील तब्बल १९ जणांली लाच स्वीकारली आहे.

सध्या शासकीय नोकरीसाठी जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. अशा स्थितीतही कठोर परिश्रम घेऊन तरुण सरकारी खुर्चीवर बसतात. आपण चांगले काम करून, सामान्यांची सेवा करण्यासह प्रामाणिक कर्तव्य बजावण्याचे ध्येय खुर्चीवर बसण्यापूर्वी ठेवतात. परंतु, त्यांना पैशांचा मोह आवरत नाही.

सरकारी अधिकारी थेट स्वत: लाच स्वीकारत नाहीत. लाचेची मागणी करून ते वसुलीसाठी खासगी लोकांचा आधार घेतात. सरकारी बाबूंची वसुली करणाऱ्या लोकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.