शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

महसूल दिन विशेष : सातबारा डिजिटायजेशनमध्ये जालना जिल्हा राज्यात आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 2:22 PM

 जिल्ह्यात जवळपास २ लाख ३३ हजार ७३३ इतके सातबारे संगणकीकृत झाले आहेत.

ठळक मुद्देगेल्या दहा वर्षांपासून सुरू होते विशेष प्रयत्न

जालना : पेपरलेस कार्यालय करण्यासाठी महसूल विभागाने जमावबंदी खात्याच्या माध्यमातून उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा उताऱ्यांचे डिजिटायजेशन करण्यासह आॅनलाईन फेरफार करणे या उपक्रमात जालना जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. 

महसूल विभागाकडून शेतजमिनी आणि नामांतर तसेच मृत्यूमुखी पडल्यानंतर वारसाचा फेर घेणे आदी कामांमध्ये मोठा वेळ खर्ची होत होता. त्याचप्रमाणे जमिनीची खरेदी-विक्री झाल्यानंतर संबंधित खरेदी-विक्रीदारांच्या हिश्यांची नोंद घेतानाही अनेक अडचणी येत होत्या; परंतु आता या अडचणी जिल्ह्यात दूर झाल्या आहेत. फेर घेणे आणि सातबारा उतारा मागण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांच्या घरी अथवा कार्यालयामध्ये येण्याची गरज उरलेली नाही.  जिल्ह्यात जवळपास २ लाख ३३ हजार ७३३ इतके सातबारे संगणकीकृत झाले आहेत.

गत काही वर्षात शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता सेतू सुविधा केंद्र आणि अन्य आॅनलाईन सुविधेच्या माध्यमातून ९ लाख १८ हजार २१० सातबाराच्या प्रती काढल्याची नोंद आहे. या सातबारा संगणकीकरणामुळे शेतकऱ्यांमधील होणारा वाददेखील कमी झाला आहे. फेर घेण्यासाठी जो कालावधी जात होता तोदेखील वाचला आहे. जवळपास २ लाख ४३ हजार ८२४ जणांचे आॅनलाईन फेरफार झाले असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. हे संगणीकरण करण्यासाठी एनआयसी विभागाची मोठी मदत झाल्याचे सांगण्यात आले. 

अन्य माध्यमातून ऑनलाईन सेवा देणारमहसूल विभागाने एकूणच संपूर्ण राज्यात पेपरलेस कार्यालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे येत्या काळात नागरिकांना कमीत कमी शासकीय कार्यालयात येण्याची गरज पडेल, अशी पावले उचलली जात आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील सेतू सुविधा केंद्र, तसेच अन्य माध्यमांतून ऑनलाईन सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नियमितपणे प्रशिक्षण देणे सुरू आहे, असे जालन्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागJalanaजालनाState Governmentराज्य सरकार