शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी, विरोधकांकडून पालिकेच्या कामाचे वाभाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST

नगरसेवक विजय चौधरी यांनी जिंदल मार्केटमधील तिसऱ्या मजल्यावर दुकाने बांधली असून, त्याची परवानगी नसल्याचा मुद्दा उपस्थित केला, तसेच शिवाजी ...

नगरसेवक विजय चौधरी यांनी जिंदल मार्केटमधील तिसऱ्या मजल्यावर दुकाने बांधली असून, त्याची परवानगी नसल्याचा मुद्दा उपस्थित केला, तसेच शिवाजी महाराज पुतळा परिसरातही परवानगीपेक्षा अधिकचे बांधकाम केले जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी शाह आलमखान यांनी इन्कमटॅक्स कॉलनीतील स्टेडियमजवळ डीपी मार्ग असताना इमारत बांधकामाच्ळा परवानगीचा मुद्दा मांडून पाणी पुरवठ्याबाबात काय नियोजन केले, अशी विचारणा केली. शिवसेनेचे गटनेते विष्णू पाचफुले यांनी मंमादेवी ते रेल्वेस्थानक मार्गाची झालेली रस्त्याची चाळणी, तसेच अन्य महत्त्वपूर्ण मुद्दे मांडून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ढक्का यांनी लोखंडी पुलाला मंमादेवी पूल असे नाव देऊन प्रवेशद्वार उभारण्याची मागणी केली.

दरम्यान, नगरसेवकांनी उपस्थित केलेले अवैध बांधकाम, तसेच पार्किंगच्या मुद्याची सविस्तर चौकशी केली जाईल, असे सांगितले. यावेळी यापूर्वीही असेच आश्वासन देण्यात आल्याचे स्मरण त्यांना काही संतप्त नगरसेवकांनी करून दिल्याचे दिसून आले. अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रात आता जालना पालिकेकडून एक मेगावॅटची सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी महात्मा फुले मार्केटची उभारणी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले, तसेच यात जुन्या व्यापाऱ्यांना प्राधान्य देण्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी नगरसेवक शशिकांत घुगे, अरुण मगरे, रामेश्वर ढोबळे, रमेश गौरक्षक, विजय पवार, फारुक तुंडीवाले, आमेर पाशा, जयंत भोसले, विजय पांगारकर आदींची उपस्थिती होती. यावेळी विषय पत्रिकेवरील ३३ विषयांना मंजुरी देण्यात आली. सभेला पालिकेचे अधीक्षक विजय फुलंब्रीकर यांचीही उपस्थिती होती.

चौकट

महिलांनी मांडले प्रश्न

आज झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेविका रुबिना खान, रफियाबेगम, संध्या देठे, पूनम स्वामी, वैशाली जांगडे यांनीदेखील त्यांच्या प्रभागातील मुद्दे मांडले. स्वामी यांनी आपल्या गेल्या वर्षभराच्या काळात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न नमूद केले. या सर्व प्रश्नांना नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी अत्यंत संयमाने आणि अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. नगरसेवकांनी त्यांचे मुद्दे लेखी स्वरूपात देण्याची मागणी केली. त्या सर्व मुद्यांची उत्तरे त्यांना देण्यात येतील, असे सांगून गोंधळ न घालण्याचे आवाहन केले होते.