शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

जालना शहरात रेनवॉटर हार्वेस्टिंग कायदा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:53 IST

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाणी पातळी वाढविण्यासाठी मदत होते. ही बाब लक्षात घेता यासाठी कायदा करण्यात आला आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाचे या कायद्याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करता यावी यासाठी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवी यासाठी शासनस्तरावरुन विविध उपक्रम राबविले जातात. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाणी पातळी वाढविण्यासाठी मदत होते. ही बाब लक्षात घेता यासाठी कायदा करण्यात आला आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाचे या कायद्याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. याचा परिणाम पर्जन्यमानावर झाला आहे. सलग चार वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. यामुळे पावसाचे पडलेले पाणी, जमिनीत जिरवून भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्यासाठी शासनाने रेन वॉटर हार्वेस्टिंगसंदर्भात कायदा केला. याबाबत नागरिकामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या सुचना नगरपालिका प्रशासनाला दिलेल्या आहेत. हार्वेस्टिंग केल्याशिवाय बांधकामास परवानगी देऊ नये अशा नगरविकास खात्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. मात्र, या चांगल्या उपक्रमाविषयी नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वाहून जाणाऱ्या पाण्याच पुनर्भरण होत नसल्याने शहरातील जुन्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत.कूपनलिकांचे पाणी खोलवर गेल्याने नागरिकांच्या समस्येत आणखीनच भर पडली आहे. साडेतीन लाखापेक्षा जास्त शहराची लोकसंख्या आहे. नवीन जालन्याला पाणीपुरवठा करणारा निजामकालीन घाणेवाडी जलाशय कोरडाठाक पडला आहे. तर जायकवाडी धरणातून नवीन शहरासाठी येणारे पाणी सुध्दा पंधरा दिवसानंतर एकदा येते. पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील विविध भागात पाण्याची टंचाई निर्माण होते.ही विपरीत परिस्थिती बदलण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी एक पर्याय आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा, रस्त्यांमध्ये पाणी तुंबू लागते. नाले भरून वाहू लागतात. त्यामुळे वाहतूक ठप्प होते. रस्त्यांमध्ये वाहणारे हे पाणी जर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या मदतीने साठविले गेले तर पाण्याचे दुर्भिक्ष्य नक्कीच कमी होईल.जलनपुनर्भरणामुळे होणारे फायदेयोग्य प्रकारे जलसंधारण आणि नियोजन केल्यास, पाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागते.तसेच जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे, पाणी वर खेचण्यासाठी लागणा-या विजेच्या वापरात बचत होते. जमिनीमध्ये जिरविले गेलेले पाणी शेतीच्या कामी वापरले जाऊ शकते. विशेषत: कमी पाऊस झाल्यास, किंवा ज्या भागांमध्ये पाण्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी ह्या साठविलेल्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. तसेच गुरांना, जनावरांना पाजण्यासाठी देखील हे पाणी वापरले जाऊ शकते. जसजशी लोकसंख्या वाढत आहे, तसतशी पाण्याची मागणी देखील वाढत आहे. म्हणूनच अनेक ठिकाणी रहिवासी भागांमध्ये पाण्याची गरज भागविण्याकरिता बोअरवेल्स खणल्या जात आहेत. परिणामी, जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. जर पावसाचे पाणी जमिनीखाली जिरवणे गरजेचे आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalana Muncipalityजालना नगरपरिषदRainपाऊस