शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

सुतार मंचच्या माध्यमातून पुनर्विवाहाची कोंडी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:30 AM

दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी समाज हा फारसा जागृत नव्हता. अंध परंपरा आणि समाजातील अनेक नागरिक काय म्हणतील, या भीतीपोटी विधवेचा पुनर्विवाह करणे म्हणजे यक्ष प्रश्न होता. तोच प्रश्न दोनशे वर्षानंतरही कायम असल्याचे वास्तव सुतार समाज मंचचे जिल्हाध्यक्ष राजेश भालेकर यांनी सांगितले.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कदोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी समाज हा फारसा जागृत नव्हता. अंध परंपरा आणि समाजातील अनेक नागरिक काय म्हणतील, या भीतीपोटी विधवेचा पुनर्विवाह करणे म्हणजे यक्ष प्रश्न होता. तोच प्रश्न दोनशे वर्षानंतरही कायम असल्याचे वास्तव सुतार समाज मंचचे जिल्हाध्यक्ष राजेश भालेकर यांनी सांगितले. या विवाहमंचच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रयत्नाने जवळपास ३९ विवाह जुळविले आहेत. मुळात त्यांचीच आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही समाजाचे आपण काही देणे लागतो, यातूनच ते सामाजिक बांधिलकी जपत आहेत.पुनर्विवाहात कुठल्या अडचणी आहेत ?एकीकडे आपण साक्षर होऊन शिक्षण आणि उच्च शिक्षण घेतले. परंतु ज्यांनी हे शिक्षण घेतले. त्यांच्याच कुटुंबामध्ये क्षुल्लक कारणावरून टोकाचे वाद होऊन विवाह संस्थाच धोक्यात आली आहे. पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी अशिक्षित पती-पत्नीमध्ये समेट घडविण्यासाठी जेवढा वेळ लागत नाही. तेवढा वेळ शिक्षित असलेल्या जोडप्यांसाठी खर्च करावा लागतो. विधवा मुलींचा तर प्रश्नच वेगळा आहे. नियतीने त्यांच्यावर ही वेळ आणली आहे. हे समजून घेण्यास समाज आजही तयार नसल्याने मोठी खंत आहे.किती विवाह जुळविले ?सुतार समाज मंचच्या माध्यमातून विधवा तसेच घटस्फोटित मुला-मुलींचे ३९ विवाह गेल्या तीन वर्षात जुळविले आहेत. तर अनेकांचे संसार तुटण्यापासून मंचने पुढाकार घेतला. यात समाजबांधवांचाही सिंहाचा वाटा आहे.हलाखीतून भरारीमूळचे जालना तालुक्यातील गोंदेगाव येथील असलेले भालेकर यांनी शालेय शिक्षण पोटाला भाकरी मिळत नसल्यामुळे अर्धवट सोडले. हॉटेलमध्ये काम करून उपजीविका भागविली. परंतु जिद्द सोडली नाही. याकामी मला समाज बांधवांसह इतर समाजांतूनही हिंमत मिळत गेली आणि त्यातूनच आज मी हे सामाजिक कार्य करतो.

टॅग्स :Socialसामाजिकcommunityसमाजmarriageलग्न