शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सातत्याने ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांनाच प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:29 IST

परतूर : आमच्या कारखान्याला सातत्याने ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांचाच प्रथम विचार होणार आहे. उसाचे वाढलेले क्षेत्र व कारखान्याची गाळप ...

परतूर : आमच्या कारखान्याला सातत्याने ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांचाच प्रथम विचार होणार आहे. उसाचे वाढलेले क्षेत्र व कारखान्याची गाळप क्षमता यामुळे सर्वांचाच ऊस जाईल याची शाश्वती देता येत नसल्याची खंत मॉ बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी लाेकमतशी बोलताना व्यक्त केली.

मॉ बागेश्वरी साखर कारखान्याने आतापर्यंत ३ हजार हेक्टरवरील ऊस आणून ३ लाख क्विंटल साखरेचे गाळप केल्याच्या पार्श्वभूमीवर चेअरमन शिवाजीरव जाधव बोलत होते. पुढे ते म्हणाले, उसाचे वाढलेले क्षेत्र व कारखान्याची गाळप क्षमता याचा विचार करता कारखाना मेपर्यंत चालवूनही दीड लाख मे. टन ऊस शिल्लक राहण्याची भीती आहे. बागेश्वरीची गाळप क्षमता २ हजार ५०० मे. टन होती, ती आपण शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता ही क्षमता ३ हजार ४०० मे. टन केली आहे. आतापर्यंत ३ लाख मे. टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. अद्याप ५ लाख मे. टन ऊस उभा आहे. काराखान्याकडे नोंद नसलेला व बाहेर देण्यात आलेल्या ७५ हजार मे. टन उसाचा प्रश्न वेगळाचा आहे. डिसेंबरमधील ऊस मार्चमध्ये जात आहे. मे अखेरपर्यंत कारखाना सुरू राहिला तरी ५ लाख मे. टनापैकी ३.५ लाख मे. टनच उसाचे कारखाना गाळप करू शकतो. म्हणजे १.५ लाख मे. टन उसाचा प्रश्न अंधातरीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढे नोंदणी केल्याशिवाय नवीन उसाची लागवड करू नये, असेही शेवटी शिवाजीराव जाधव म्हणाले. या वेळी के. आर. निर्वळ, सरपंच मधुकर झरेकर, संतोष दिंडे आदी उपस्थित होते.

....

जालना जिल्ह्यात ६ लाख मे. टन अतिरिक्त ऊस

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मार्चनंतर काही ऊस बळीराजा साखर कारखाना पूर्णाकडे पाठवण्याचे नियोजन आम्ही करीत आहोत. पूर्ण जिल्हाभरात ५ ते ६ लाख मे. टन ऊस अतिरिक्त आहे. अधिकच्या उसाचा प्रश्न शासनाला कळविण्यात येईल, कारण सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप झाले पाहिजे, मात्र उसाचे सातत वाढत जाणारे क्षेत्र व काराखान्याची मर्यादित गाळप क्षमता, यामुळे अडचण आहे.

.............

फोटो. पान ४ शिवाजीराव जाधव