शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पोस्ट कोविड रूग्ण वाऱ्यावर; आरोग्य विभागाकडून होतेय दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST

जालना : जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन रूग्णांची संख्या आता कमी आढळत आहे. असे असले तरी कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या ...

जालना : जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन रूग्णांची संख्या आता कमी आढळत आहे. असे असले तरी कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रूग्णांना विविध आजार होत असल्याचे समोर आले आहे. अनेकांचा घरी गेल्यावर मृत्यू झाल्याचीही उदारहणे आहेत. असे असतानाही एकदा रूग्ण बाहेर पडला की, त्याच्याशी कसलाही संपर्क साधला जात नाही. तसेच तपासणीही केली जात नाही. त्यामुळे हे रूग्ण वाऱ्यावर सोडले जात आहेत. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याने पोस्ट कोविडमुळेही रूग्ण दगावत आहेत. यासाठी नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.

जालना जिल्ह्यात १२ हजार ७९० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १२ हजार १२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे ३३५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाचे नवीन रूग्ण निघण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी धोका अजून टळला नाही. त्यामुळे कोरोना झालेल्या रूग्णांची काळजी घेणे गरजेचे असतानाही आरोग्य विभागातर्फे काळजी घेतली नाही. अनेकांना थकवा, खोकला, तोंडाला चव न येणे अशी लक्षणे जाणवत आहे. त्यामुळे त्यांची तपासणी होणे गरजेचे आहे.

आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात रूग्ण वाऱ्यावर

जालना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात आले होते. परंतु, सध्या हे पोस्ट कोविड सेंटर नावालाच सुरू आहेत. त्यामुळे रूग्ण वाऱ्यावरच आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्याचे आरोग्यमंत्री असतानाही अधिकारी पोस्ट कोविड रूग्णांकडे दुर्लक्ष करीत आहे.

ओपीडी सुरू

आम्ही शासकीय रूग्णालयात पोस्ट कोविड सेंटर सुरू केले आहे. परंतु, रूग्ण येत नाही. रूग्णांना डिस्चार्ज देतेवेळी काही थकवा जाणवल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले जाते. आता पोस्ट कोविड रूग्णांशी संपर्क केला जाईल. काही त्रास जाणवल्यास संपर्क करावा.

- अर्चना भोसले,

जिल्हा शल्य चिकित्सक