शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लोकसंख्या वाढली, सोयीसुविधा जैसे थे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:55 IST

जालना जिल्ह्यात गेल्या १८ वर्षांत जवळपास साडेसहा लाखांनी लोकसंख्या वाढली असली तरी सोयी-सुविधांत मात्र फारसा फरक पडला नाही.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात गेल्या १८ वर्षांत जवळपास साडेसहा लाखांनी लोकसंख्या वाढली असली तरी सोयी-सुविधांत मात्र फारसा फरक पडला नाही. वाहनांची संख्या प्रचंड वाढली. तुलनेत रस्ते मात्र तसेच राहिले. शाळांच संख्या वाढली, गुणवत्तेच्या नावाने आनंदीआनंदच आहे.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख २२ हजार ३५७ इतकी होती. २०११ च्या जनगणनेनुसार ती १९ लाख ५८ हजार ४८३ इतकी झाली. यात १० लाख १५ हजार ११६ पुरूष तर ९ लाख ४३ हजार ३६७ महिला होत्या. प्रशासकीय माहितीनुसार २०१९ मध्ये लोकसंख्या २२ लाख ६१ हजार ३३८ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण ७१.५२ टक्के आहे.जालना जिल्ह्यात दहा वर्षांत जवळपास एक लाखापेक्षा अधिक दुचाकी वाढल्या आहेत. आज जिल्ह्यात एकूण दोन लाख ९५ हजार २११ दुचाकी असून, चारचाकी वाहनांची संख्या ही २० हजार ९०० आहे. ज्या प्रमाणे वाहनांची संख्या वाढली त्या तुलनेत रस्ते रूंद झाले नसून, जागोजागी वाहतुकीची कोंडी पाहावयास मिळत आहे. ही वाहनांची वाढ आता कमी होणे शक्य नसल्याचे प्रादेशिक परिवहन निरीक्षक विजय काळे यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यात मोठे सात, मध्यम २४, तर लघु ९९९ असे एकूण १०३० उद्योग आहेत. दुग्ध व्यवसाय शीतकरण केंद्र २, सहकारी दूध संस्था १०८, एकूण सहकारी संस्था २८२८, सहकारी साखर कारखाने ५ असून, यातील चार सुरू आहेतशाळांची संख्या वाढली; दर्जा घसरलाजालना जिल्हा हा पूर्वीपासून शैक्षणिकदृष्ट्या मागसलेला आहे. या जिल्ह्यात मुलींच्या शाळा गळतीचे प्रमाण हे आदिवासी जिल्ह्यांपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील गावोगावी मराठी आणि त्या तुलनेत अधिक इंग्रजी शाळा दिसतात. परंतु शिक्षणाच्या विकेंद्रीकरणाखाली दर्जा हरवून बसला आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद, नगर पालिका तसेच खाजगी शाळांचा विचार केल्यास ही संख्या दोन हजार पेक्षा अधिक आहे. आपल्या मुलाला इंग्रजी शाळेत जास्तीचे पैसे मोजून घालण्याकडे कल वाढला आहे. हे ठीक असले तरी, मराठी आणि अन्य विषयांमध्ये दर्जाला महत्त्व राहिले नाही. ही खंत शिक्षणतज्ज्ञ बी.वाय. कुलकर्णी यांनी व्यक्त केली.मुलींचा जन्मदर वाढलाजालना जिल्ह्यात गेल्या दशकभरात ज्या प्रमाणे लोकसंख्या वाढ झाली आहे, त्याच धर्तीवर मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे. २०११ चा विचार केल्यास एक हजार मुलांमागे ९६० मुली जन्माला येत. हे प्रमाण आता ९२० वर आले आहे. तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसह महिलाकंकडून गर्भनिरोधक गोळ्या, इंजेक्शनचा वापर वाढला आहे. वैद्यकीय सेवा-सुविधेचा विचार केल्यास त्यातही अत्याधुनिक उपचार पध्दतीचा समावेश झाला आहे. सरकारी प्रमाणेच खाजगी रुग्णालयांच्या संख्येतही दहा वर्षात लक्षणीय वाढ झाली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले.प्राथमिक आरोग्य केंद्रेनागरिकांना आरोग्याची सेवा पुरविण्यासाठी एक जिल्हा रूग्णालय, एक महिला रूग्णालय, ८ ग्रामीण रूग्णालये, ४० प्राथमिक आरोग्य केंद्रे, २१३ उपकेंद्रे आहेत. तसेच खाजगी रूग्णालयांची संख्याही मोठी आहे.

टॅग्स :civic issueनागरी समस्याSocialसामाजिकFamilyपरिवार