शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावीच्या ऑफलाईन परीक्षांमुळे पालक झाले चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:38 IST

जालना : एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे; तर दुसरीकडे शिक्षणमंत्र्यांनी दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...

जालना : एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे; तर दुसरीकडे शिक्षणमंत्र्यांनी दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयामुळे बहुतांश पालकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.

गतवर्षी मार्च-एप्रिल महिन्यांतच कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव झाला. त्यामुळे शाळांना कुलूप लागले. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. परंतु, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले. शाळा सुरू झाल्या असल्या तरी कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनी शाळा नियमित केली नाही. त्यात आता कमी झालेले कोरोना रुग्ण वाढत असून, ऑफलाईन परीक्षेत सूचनांचे पालन होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते?

कोरोनामुळे मुलांचे ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण व्यवस्थित झाले नाही. वाढणारे रुग्ण पाहता शासनाचा निर्णय योग्य वाटत नाही.

बाबासाहेब साकळकर

परतूर

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण झालेला नाही. कोरोना वाढत असताना ऑफलाईन परीक्षा योग्य नाहीत.

गजानन भुजबळ

अंतरवाली सराटी

विद्यार्थांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन होण्यासाठी ऑफलाईन परीक्षा योग्य आहे. कोरोनातील नियमांचे पालन करून परीक्षा घ्याव्यात.

संतोष जोशी

अंबड

बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते?

बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेणे योग्य आहे. अनेक भागांत इंटरनेटची अडचण असून, मुलांना परीक्षेत व्यत्यय येऊ शकतो.

रमेश थोरे

अंबड

दहावीच्या परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे वाढते कोरोनाचे रुग्ण पाहता शासनाने पुनर्विचार करावा.

रंगनाथ मुळे,

कुंज

कोरोनामुळे इतर शाखेच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे बारावीच्या परीक्षाही ऑनलाईन घेण्याची गरज आहे.

संजय खैरे,

पाथरवाला खुर्द

परीक्षेचे वेळापत्रक

दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे

बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे

विद्यार्थिसंख्या

दहावी ३६०४२

बारावी ३१८२८