शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

निसर्गाचा प्रकोप; बळीराजा हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 12:22 AM

परतीच्या पावसाने केलेल्या हाहाकाराने टेंभुर्णीसह परिसरात खरीप हंगामाची दाणादाण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : परतीच्या पावसाने केलेल्या हाहाकाराने टेंभुर्णीसह परिसरात खरीप हंगामाची दाणादाण झाली आहे. निसर्गाच्या या प्रकोपाने बळीराजा पुरता भांबावून गेला असून, त्याच्या दैनीला वाण राहिलेले नाही. दरम्यान दोन- चार दिवसांच्या उघडीपीनंतर गुरूवारी सायंकाळी पुन्हा तासभर धो- धो पाऊस येथील परिसरात कोसळल्याने बळीराजाचे अवसान पुन्हा गळाले आहे.मका, सोयाबीन हातचे गेले. निदान अर्धीनिर्धी कपाशी तरी हाती येईल ही वेडी आशा शेतकरी बाळगून होता. मात्र, आता कापसाच्या वाती झाल्या तर आलेली बोंडही काळी होवून गळून पडत आहे. अतिपावसाने कपाशीची झाडे पिवळी पडू लागली आहेत. यामुळे आता कपाशीच्या आशाही मावळल्या आहेत.मागील दोन दिवसांच्या उघडीपीत शेतकरी कोंब फुटलेली मकाची कणसे, सोयाबीनचे काड जमा करण्यात गुंतला होता. त्यातच गुरुवारी पुन्हा पाऊस बरसल्याने निसर्गाच्या या क्रूरचेष्टेपुढे बळीराजा हतबल झाला आहे. ऐन दिवाळीच्या दिवसांत निसर्गाने खरीप हंगामाचं दिवाळं काढल्याने बळीराजा अक्षरश: मेटाकुटीला आला आहे.सरसकट मदतीची मागणीटेंभुर्णी परिसरात जवळपास सगळीकडेच निसर्गाने हे तांडव मांडल्याने खरीप पिके उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे आता पंचनाम्यांचा फार्स न करता शासनाने सरसकट एकरी मदत जाहीर करून ती त्वरीत शेतकऱ्यांच्या हाती द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीभोकरदन : परतीच्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, या मागणीचे निवेदन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती प्रतिष्ठानतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. खरीप हंगामातील पिकांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले असल्याने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच केदारखेडा येथील पूर्णा नदीचे पाणी नदीकाठच्या शेतात गेल्याने पिके वाहून गेली आहेत. यामुळे शेतक-यांना आर्थिक मदतीची गरज असल्याचेही म्हटले आहे. यावेळी महेश पुरोहित, मनीष श्रीवास्तव, रमेश पगारे, शिवाजी पुंड, कृष्णा बोराडे, मारुती गाडेकर, राजू शेळके, रायभान शिंदे, प्रदीप पैठणकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी