शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
2
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
3
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

टँकर्सची संख्या ४५ वर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:58 AM

दोन आठवड्यांपूर्वी ३९ असलेली टँकरची संख्या आत्ता ४५ वर गेली आहे. जालना, भोकरदन, जाफराबाद आणि परतूर तालुक्यातील टंचाई तीव्र झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात दिवसेदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. यामुळे ग्रामीण भागातील जलसाठ्यांत घट झाल्याने पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरूवात झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी ३९ असलेली टँकरची संख्या आत्ता ४५ वर गेली आहे. जालना, भोकरदन, जाफराबाद आणि परतूर तालुक्यातील टंचाई तीव्र झाली आहे.यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. जाफराबाद, भोकरदन या तालुक्यांतही बऱ्यापैकी पाऊस झाला. मात्र, या दोन्ही तालुक्यांत कडक खडक असल्याने कितीही पाऊस पडला तरी पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. परिणामी लघु मध्यम प्रकल्प, बोअरवेल, विहिरी आदींना पाणीच राहत नाही. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाते. जलसाठा वाढत नसल्याने या तालुक्यांत टँकरची संख्या दरवर्षी वाढत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे जाफराबाद तालुक्यात १६ टँकर, भोकरदन तालुक्यात २७ टँकवरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच जालना आणि परतूर तालुक्यात सुध्दा काही भाग खडकाळ असल्याने अल्प प्रमाणात टँकरची मागणी आहे.वाढते सिंचन आणि जायकवाडी धरणाचा परिसर असल्याने अंबड, घनसावंगी, मंठा आणि बदनापूर या तालुक्यांत वाढलेल्या सिंचनामुळे अद्याप टँकरची मागणी आलेली नाही. मात्र, आगामी काळात मागणी होण्याची शक्यता अधिका-यांनी व्यक्त केली आहे. टंचाईकृती आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे. उपाययोजना आखण्यात आलेली आहे. मागणीनुसार टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे अभियंत्यांनी सांगितले.जिल्ह्यातील जलसाठे कमी होत असल्याने टंचाईच्या झळा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. जलयुक्तच्या कामांमुळे तात्पुरत्या स्वरुपात साठा वाढला. पण तोही आटल्याने येत्या काळात टंचाई भीषण होण्याची शक्तय गृहित धरुन प्रशासनाने उपाययोजना आखली आहे. टॅकर्सची संख्या शतक गाठण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Jalanaजालनाwater shortageपाणीटंचाई