शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंरोजगार उभारणीसाठी कौशल्य विकासाची आवश्यकता- प्रा. खिल्लारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST

जालना : उद्योग व्यवसाय सुरू करून स्वावलंबी बनण्यासाठी कौशल्याची गरज असून, ती मिळविण्यासाठी स्वावलंबी शाश्वत विकास अभियानाचा उपक्रम निश्चितच ...

जालना : उद्योग व्यवसाय सुरू करून स्वावलंबी बनण्यासाठी कौशल्याची गरज असून, ती मिळविण्यासाठी स्वावलंबी शाश्वत विकास अभियानाचा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन तज्ञ प्रशिक्षक प्रा. अविनाश खिल्लारे यांनी केले.

धरतीधन ग्राम विकास संस्था आणि कुलस्वामी बेरोजगार सेवा सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जालना येथे आयोजित एक दिवसीय उद्योजकता विकास कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिलिंद सावंत हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाबँक स्वयरोजगार प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी संचालक अरूण कासार, कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन केंद्राच्या समपुदेशक शमीम बी पठाण, मंकरद जहागिरदार, ज्ञानेश्वर मोकळे, पुष्कराज तायडे, विक्रांत खरडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी युवक, युवती, शेतकरी व महिला बचत गटातील सदस्यांसाठी प्रशिक्षण घेऊन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वावलंबी शाश्वत विकास अभियानाअंतर्गत एक दिवसीय मोफत उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वावलंबी शाश्वत विकास अभियानाचे अध्यक्ष मिलींद सावंत यांनी दिली. तज्ञ प्रशिक्षक प्रा. खिल्लारे व खरडे यांनी उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, विविध क्षेत्रातील उद्योगाच्या संधी, शासनाचे औद्योगिक धोरण, कंपनीसाठी लागणारे वेगवेगळे नोंदणी परवाने, कृषी उद्योग, लघुउद्योग, गृहउद्योग, नाबार्ड योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना आदींबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिक्षा बोरूडे यांनी तर आभारप्रदर्शन जयंसिंग सिल्लोडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाश्वत विकास अभियानाचे कृष्णा भालेराव, गजानन कदम, अक्षय सावंत, रघुनाथ गोरे आदींनी परीश्रम घेतले.