शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

मध्यम प्रकल्प जोत्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 1:12 AM

कडक उन्हामुळे आहे त्या पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. याचा फटका जलाशयातील पाणी साठ्याला बसल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील मध्यम आणि लघुप्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कडक उन्हामुळे आहे त्या पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. याचा फटका जलाशयातील पाणी साठ्याला बसल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील मध्यम आणि लघुप्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे.लघु पाटबंधारे विभागाने बांधलेले जिल्ह्यात सात मध्यम तर ५७ लघू प्रकल्प आहेत. यातील एक मध्यम आणि २३ लघू प्रकल्पांची पाणी पातळी ही, जोत्याच्या खाली गेली आहे. गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा बहुतांश प्रकल्पांमध्ये थोडेफार का होईना; पाणी शिल्लक आहे. मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने प्रकल्पातील पाणी चोरी करून शेतीला देणाऱ्यांवर कारवाई केल्याने हे पाणी शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. त्यातच जिल्ह्यात विविध ठिकाणी जलयुक्तची कामे झाल्यानेही त्याचा चांगला परिणाम भूगर्भातील पाणीपातळी वाढीस झाल्याचे लघू सिंचन विभागाकडून सांगण्यात आले.लघू प्रकल्पांमध्ये जालना तालुक्यातील वाकी, दरेगाव, जामवाडी, निरखेड तांडा, वानडगाव, कुंभेफळ, बदनापूर तालुक्यातील सोमठाणा, भोकरदन तालुक्यातील बरंजळा, प्रल्हादपूर, पिंपळगाव कोलते, चांदई एक्को, पळसखेडा, बाणेगाव, रेलगाववाडी. अंबड तालुक्यातील मार्डी, कानडगाव, भातखेडा, धनगर पिंप्री, खडकेश्वर, पानेगाव. घनसावंगी तालुक्यातील मुसा भद्रायणी, जांब समर्थ, मानेपुरी, बोर रांजणी. मंठा तालुक्यातील सारवाडी, वाई या गावांचा समावेश आहे. येत्या मे महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यात आहे. त्यामुळे पाणीपातळीमध्ये घट होणार असून, आहे ते पाणी काटकसरीने वापरण्याची गरज आहे.मध्यम प्रकल्प : उपयुक्त जलसाठा केवळ २१ टक्क्यांपर्यंतसध्या जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्पात उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी ही २० टक्के असून, ५७ लघू प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठा सरासरी २१ टक्के एवढा आहे. सहा पैकी भोकरदन तालुक्यातील धामना हा प्रकल्प जोत्याखाली गेलेला आहे. महिनाभरात यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळ