शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

फळ बागांच्या नुकसानीचे पंचनामी करा; जालन्यात ‘स्वाभिमानी’चा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 15:16 IST

या रास्तारोको आंदोलनामुळे जालना- बीड महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे डाळिंब, मोसंबी, द्राक्षे, ऊस यासह इतर फळपिकांचे मोठे नुकसान प्रत्येक शेतकऱ्यांना पाच ते सहा लाख रूपयांचा फटका

वडीगोद्री (जि. जालना) : अतिवृष्टीमुळे फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे फळ पिकांचे पंचनामे करून शेकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि.१५ )  सकाळी सुखापुरी फाट्यावर (ता.अंबड) रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या रास्तारोको आंदोलनामुळेजालना- बीड महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे डाळिंब, मोसंबी, द्राक्षे, ऊस यासह इतर फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून खरिपातील काही पिकांचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. मात्र, फळपिकांचे पंचनामे अद्यापही सुरू करण्यात आलेले नाहीत. मोसंबीवर रोगराई पडल्याने, फळगळ झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांवर करपा पडल्याने प्रत्येक शेतकऱ्यांना पाच ते सहा लाख रूपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील फळपिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी सकाळी जालना- बीड महामार्गावरील सुखापुरी फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

रास्तारोको आंदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. मंडळाधिकारी दिवाकर जोगलादेवीकर यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, जिल्हा सचिव पांडुरंग गटकळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश बोर्डे, राधाकिसन मैंद, वडीकाळ्याचे सरपंच रामभाऊ काळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :agitationआंदोलनJalanaजालना