शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

फळ बागांच्या नुकसानीचे पंचनामी करा; जालन्यात ‘स्वाभिमानी’चा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 3:10 PM

या रास्तारोको आंदोलनामुळे जालना- बीड महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे डाळिंब, मोसंबी, द्राक्षे, ऊस यासह इतर फळपिकांचे मोठे नुकसान प्रत्येक शेतकऱ्यांना पाच ते सहा लाख रूपयांचा फटका

वडीगोद्री (जि. जालना) : अतिवृष्टीमुळे फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे फळ पिकांचे पंचनामे करून शेकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि.१५ )  सकाळी सुखापुरी फाट्यावर (ता.अंबड) रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या रास्तारोको आंदोलनामुळेजालना- बीड महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे डाळिंब, मोसंबी, द्राक्षे, ऊस यासह इतर फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून खरिपातील काही पिकांचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. मात्र, फळपिकांचे पंचनामे अद्यापही सुरू करण्यात आलेले नाहीत. मोसंबीवर रोगराई पडल्याने, फळगळ झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांवर करपा पडल्याने प्रत्येक शेतकऱ्यांना पाच ते सहा लाख रूपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील फळपिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी सकाळी जालना- बीड महामार्गावरील सुखापुरी फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

रास्तारोको आंदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. मंडळाधिकारी दिवाकर जोगलादेवीकर यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, जिल्हा सचिव पांडुरंग गटकळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश बोर्डे, राधाकिसन मैंद, वडीकाळ्याचे सरपंच रामभाऊ काळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :agitationआंदोलनJalanaजालना