शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

महाराष्ट्रात ७५ हजार प्राध्यापकांच्या जागा अद्यापही रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:35 IST

एमफोक्टोचे ज्येष्ठ नेते आणि प्रा. डॉ. मारुती तेगमपुरे यांच्याशी उच्चशिक्षण आणि वास्तव या विषयावर लोकमतने त्यांच्याशी केलेली चर्चा

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री एका ऐतिहासिक शिक्षण संस्थेच्या हिरक महोत्सवानिमित्त सोमवारी जालन्यात येत आहेत. कुशल मनुष्यबळ निर्मितीची केंद्र हे राज्यातील महाविद्याय असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देताना यांचे नाकीनऊ येत आहेत, प्राध्यापकांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत, अनुदानित तसेच विना अनुदानित प्राध्यापकांचे अनेक गंभीर प्रश्न आहेत, त्यासाठी राज्य सरकार हवे तेवढे लक्ष देत नसल्याने परिस्थिी विदारक बनली आहे. एक केंद्रीय मंत्री म्हणून प्रकाश जावडेकर यांनी या मुद्याकडे गंभीरतेने लक्ष घालण्याची गरज आहे. ते जालन्यात येत असल्याच्या निमित्त एमफोक्टोचे ज्येष्ठ नेते आणि प्रा. डॉ. मारुती तेगमपुरे यांच्याशी उच्चशिक्षण आणि वास्तव या विषयावर लोकमतने त्यांच्याशी केलेली चर्चाप्रश्न : राज्यातील शिक्षण क्षेत्रावर आपण काय भाष्य कराल?उत्तर : खरं तर आपण अतिशय गंभीर परिस्थितीतून जात आहोत. सर्वच क्षेत्रात काही बर चाललयं अस म्हणता येत नाही, आपण फक्त शिक्षणाच्या अनुषंगाने जरी बोलायचं ठरवलं तरी अवघड परिस्थिती आहे. आता हेच पाहा राज्यातील उच्च शिक्षणाचा मोठा विभाग आपण विनाअनुदानित महाविद्यालयांच्या भरवशावर सोडला आहे, त्याठिकाणी अपवाद वगळता मान्यताप्राप्त शिक्षक नाहीत, शिक्षकांना वेतन नाही अशा वातावरणात गुणात्मक शिक्षणाची प्रक्रिया कशी पुढे जाणार आहे. कोणत्या विषयासाठी, कोणत्या महाविद्यालयात किती शिक्षक असावे. याबाबतचे मापदंड त्या-त्या विद्यापीठामध्ये केवळ मार्गदर्शक सुचना म्हणून नव्हे तर बंधनकारक नियम म्हणून महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठामध्ये अस्तित्वात आहेत. या निमयमांना बगल दिली गेल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देताना अडचणी येत आहेत.प्रश्न : आपल्या आंदोलनातील प्रमुख मागण्या कोणत्या आहेत?उत्तर : आमसभेने १७ जून २०१८ रोजी संमत केलेल्या आंदोलनाच्या ठरावातील मागण्यांच्या समर्थनार्थ महासंघाच्या कार्यकारी मंडळाने २९ जुलै २०१८ रोजीच्या बैठकीत संमत केलेल्या ठरावात एकूण नऊ मागण्या करण्यात आलेल्या आहेत, त्यास आम्ही नऊरत्न असे संबोधित करतोय, यातील प्रत्येक मागणी अतिशय महत्त्वाची आणि दीर्घकाळ परिणाम करणारी आहे. आम्ही काही वेगळ मागत नाही, तर उच्च शिक्षण क्षेत्रातील शीर्षस्थ संस्थांनी जे सांगितले आहे त्याची अंमलबजावणी करा एवढंच आमचं म्हणनं आहे. १९८८ च्या कार्यभारानूसार राज्यातील ७५ हजारांपेक्षाही अधिक जागा रिक्त आहेत. या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली तरी बरेच काही साध्य करता येऊ शकते. विना अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांचे वेतन आणि निवृत्तेवन हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे.प्रश्न : वेतन आयोगासंदर्भात एमफुक्टोची काय भुमिका आहे?उत्तर : आज वरच्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा इतिहास तपासला तर काय दिसतं, महाराष्ट्रात चार्तुवर्ग व्यवस्थेचा अंगीकार करण्यात आला आहे. सर्व विभागांना वेतन आयोग लागू केल्यानंतर प्राध्यापकांसाठी तो लागू केला गेला आहे. ही प्रथा बंद करून वर्ग एक पासून ते वर्ग चार पर्यंतच्या केंद्र आणि राज्य सरकारच्य सर्व कर्मचाऱ्यांना एकाचवेळी या आयोगानुसार वेतन देणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रProfessorप्राध्यापक