शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

Maharashtra Election 2019 : कार्यकर्ते जोमात तर शेतकरी पावसामुळे चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 6:15 PM

शेतकरी मतदार मात्र पावसाच्या चिंतेने हैराण

राजूर : विधानसभा निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर आली असून, उमेदवारांनी प्रचाराला गती दिली आहे. आपापल्या पक्षाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून शेतकरी मतदार मात्र पावसाच्या चिंतेने हैराण झाल्याचे चित्र राजूर परिसरात दिसून येत आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी राजूरेश्वराला नारळ फोडून प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. उमेदवारांनी आपापल्या कार्यकर्त्यांना प्रचाराच्या कामाला भिडवल्याने कार्यकर्त्यांनी सुध्दा मरगळ झटकून पायाला भिंगरी बांधली आहे. खेड्यापाड्यात कार्यकर्ते प्रचार करीत असले तरी शेतकऱ्यांमध्ये निवडणुकीचा ऊत्साह कमी दिसून येत आहे. राजूर हे पंचक्रोशितील गावांचे राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते. कोणत्याही निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ राजूरेश्वरापासून केला जातो.  

यावर्षी राजूरसह परिसरात एकही जोरदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम रिमझीम पावसावर तग धरून आहे. परतीच्या पावसाने सुध्दा दगा दिल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. विहीरी, ओढे, नाले, तलाव कोरडेठाक असल्याने शेतकऱ्यांना पाण्याची चिंता सतावत आहे. परिसरात पाण्याची भिषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. संभाव्य पाणी समस्येने सामान्य नागरिकांच्या डोळ््यात पाणी येत आहे. रिमझीम पावसावर खरीपाचा हंगाम निघेल मात्र रब्बीचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अर्थिक नियोजन शेती व्यवसायावर अवलंबून राहात असल्याने त्यांना ऊदरनिवार्हाची चिंता सतावत आहे. त्यामुळे विविध पक्षाचे उमेदवार कार्यकर्ते जोमात फिरत असले तरी शेतकरी मात्र निवडणुकीच्या काळातही चिंतेत दिसून येत आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019jalna-acजालनाJalanaजालना