शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

माणसे कमी, कामाचा व्याप जास्त; जिल्ह्यात जात पडताळणीला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जिल्ह्यात जात पडताळणी समितीकडे मनुष्यबळ कमी असल्याने कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : जिल्ह्यात जात पडताळणी समितीकडे मनुष्यबळ कमी असल्याने कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी जास्तीचा वेळ लागत आहे.

शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह सेवा, निवडणूक उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्राची गरज असते. त्यामुळे बहुतांशजण ऑनलाईन, तर काहीजण ऑफलाईन जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करतात. परंतु, जात पडताळणी समितीकडे कमी मनुष्यबळ असल्याने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. गत महिन्यात जात पडताळणी समितीकडे ४,९८८ प्रकरणे दाखल झाली होती. त्यापैकी केवळ ६८२ प्रकरणे निकाली काढण्यात आली तर ४,३०६ प्रकरणे प्रलंबित असल्याचे जात पडताळणी समितीकडून सांगण्यात आले आहे. सध्या शाळा, महाविद्यालये सुरू असून, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र गरजेचे असते. परंतु, त्यांना ते वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

समितीकडील मनुष्यबळ

जालना येथील जात पडताळणी समिती कार्यालयात एक अध्यक्ष, एक उपायुक्त, एक सदस्य सचिव, पोलीस उपअधीक्षक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, पोलीस कर्मचारी आदींची पदे भरण्यात आलेली आहेत. तर लघुलेखक श्रेणी, कनिष्ठ लिपिक यांची पदे रिक्त आहेत.

आठ दिवसानंतर मिळतेय प्रमाणपत्र

विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केल्यानंतर त्यांना आठ ते दहा दिवसानंतर प्रमाणपत्र मिळते. अधिकारी व पदाधिकारी नसल्याने प्रमाणपत्र मिळण्यास जास्तीचा वेळ लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो.

गत महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले होते. त्यातच शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने जात प्रमाणपत्रासाठी अर्ज वाढले. आमच्याकडे मनुष्यबळ कमी असले तरी आम्ही संबंधितांना जात प्रमाणपत्र लवकर कसे दिले जाईल, यासाठी प्रयत्न करतो. आम्ही तातडीने जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्न करू.

प्रदीप भोगले, सचिव

२५ रोज दाखल होणारी प्रकरणे

४,९०० एका महिन्यात दाखल प्रकरणे

६५ रोज निकाली निघणारी प्रकरणे

४,३०६ प्रलंबित असलेली प्रकरणे