शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

जालना जिल्ह्यात उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 12:40 AM

जालना शहर व जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून तापमानात वाढच होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उन्हाचा पारा वाढू लागल्याने सर्वत्र तप्त वातावरण आहे. याचा मोठा फटका शेती कामालाही बसल्याचे दिसून आले. जालना शहर व जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून तापमानात वाढच होत आहे. यामुळे एकूणच जनजीवनावर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर कडक ऊन पडत असल्याने प्रचारावरही त्याचा परिणाम होत आहे. बहुतांश उमेदवार आणि त्यांचे समर्थक हे सायंकाळी चार नंतर आणि सकाळी ११ च्या आत प्रचार उरकून घेत असल्याचे चित्र आहे. प्रचारा सोबतच दररोज गर्दीने फुलणारने रस्ते दुपारी एक ते पाच यावेळेत ओस पडलेले आहेत. दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अनेकजण घराच्या बाहेर न पडणेच पसंस करत असल्याचे दिसून आले.सध्या जे काही नागरिक त्यांच्या कामानिमित्त बाहेर पडत आहेत, ते सर्वजण पांढरा गमछा बांधून आणि डोळ्यांना गॉगल्स घालूनच बाहेर फिरताना दिसत आहेत. पांढरे कापड वापरणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय वाढली आहे. जालन्यात पांढरे कापड घालणे म्हणजे जास्तीत- जास्त तीन तासात ते धुळीने माखलेले असते. त्यामुळे पांढरे कपडे हे जालन्यात ज्यांच्याकडे प्राधान्याने चारचाकी गाडी आहे, तेच जास्त वापरत असल्याचे दिसून आले.अनेक रस्त्यावर तर आता पूर्वीप्रमाणे गडद सावली देणारे झाडे देखील नामशेष झाले आहेत. सावली शोधूनही मिळत नसल्याचे वास्तव आहे.ऐन कडक उन्हाळ्यात जालनेकरांना पाणीटंचाईचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे. एकूणच वाढत्या उन्हामुळे थंडपेयाची विक्री वाढली असून, द्राक्ष, कैरी, टरबूज, खरबूज यांना मोठी मागणी असून, अननसही बाजारात दाखल झाले आहेत.दक्षता घ्यावीघराबाहेर पडताना पांढरा रूमाल बांधूनच बाहेर पडावे.डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल्सचा वापर करावा.सुती व सैलदार कपडे वापरावे. जेणेकरून उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होईल.तहान नसतानाही जास्तीचे पाणी प्यावे.दुपारी १२ ते ५ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.कृत्रिम थंडपेयांऐवजी दही, लिंबू शरबत, ताक, उसाचा रस, कैरीचे पन्हे आहारात नित्य घ्यावे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातTemperatureतापमानHealthआरोग्य