शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

आठवडा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:34 IST

मंठा शहरातील रस्त्यावर बसून भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे. लोकमत न्यूज नेटवर्क मंठा : तालुक्यात गेल्या काही ...

मंठा शहरातील रस्त्यावर बसून भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मंठा : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे. यासाठी प्रशासनाने आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी मंठा येथील आठवडा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर बसून भाजीपाल्याची विक्री करावी लागली.

गतवर्षात कोरोना महामारीमुळे सात ते आठ महिने आठवडा बाजार बंद होता. त्यावेळी भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली होती. बहुतांश शेतकऱ्यांना भाजीपाला रस्त्यावर फेकावा लागला. त्यामुळे भाजीपाल्याच्या लागवडीत मोठी घट झाली. परिणामी, भाजीपाल्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले होते. दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने टप्प्याटप्प्याने सर्वच व्यवहार सुरळीत झाले होते. त्यातच विहिरींमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली. दरही स्थिर झाले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लागवड केलेला भाजीपाला कुठे विकावा, अशा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. आठवडा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना शहरातील रस्त्यावर बसून भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे.

शहरात कोरोनाच्या नियमांचा फज्जा

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने आठवडा बाजार बंद केला असला, तरी शहरात गर्दीच्या ठिकाणी नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे पोलीस तसेच नगर पंचायतीचेही दुर्लक्ष होत आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.

===Photopath===

280221\28jan_9_28022021_15.jpg

===Caption===

मंठा शहरात शेतकर्यांना रस्त्यावरच बसून भाजीपाला विकावा लागत आहे.