शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

चुर्मापुरीत चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:43 AM

अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथील हनुमाननगरमध्ये रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला

लोकमत न्यूज नेटवर्कअंकुशनगर : अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथील हनुमाननगरमध्ये रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री दोन घरफोड्या केल्या. सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह १ लाख ११ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. दरम्यान, सध्या जिल्हाभरात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच चोरटे धुमाकूळ घालत असल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळी आहे.उन्हाळ््याचे दिवस असल्याने रात्री ग्रामस्थ घराच्या छतावर झोपण्यासाठी जात आहेत. याच संधीचा फायदा घेत रविवारी मध्यरात्री चुर्मापुरीमधील हनुमाननगर येथील दोन घरांवर चोरट्यांनी डल्ला मारला. येथील बबरुन बजुगडे हे आपल्या शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. त्यांच्या घरी त्यांची पत्नी व दोन मुले झोपलेले होते. चोरट्यांनी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास त्यांच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरामध्ये असलेल्या पेट्या व कपाटातील सामानाची नासधूस केली. परंतु, त्यांच्या घरात चोरट्यांना फक्त ३ हजार रुपये रोख रक्कम मिळाली. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारी असलेल्या लक्ष्मण कोंडीबा रसाळ (६०) यांच्या घराकडे वळविला. रसाळ कुटुंब हे गरमीमुळे घराच्या छतावर छोपलेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या पाठीमागे असलेल्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.त्यानंतर कपाटाची मोडतोड केली. कपाटात विहिरीच्या कामासाठी ठेवलेले ६८००० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. त्यानंतर तीन पेट्या उचलून घरापासून जवळच असलेल्या खदानीत नेऊन टाकल्या. या पेट्यांमधील ४० हजार रुपये तसेच ९ ते १० तोळे सोने असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.दरम्यान, बबरुन बजगुडे हे पहाटे तीन वाजेच्या सुमारास शेतातून घरी आले असता, त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे कळाले. त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर रसाळ यांच्या घरातही चोरी झाल्याचे समजले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवानंद देवकर, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, नसिर सय्यद, योगेश दाभाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, उपविभागीय अधिकारी सी. डी. शेवगण यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर श्वान पथक तसेच मोबाईल लोकेशन पथक पाचारण झाले.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणमागील काही दिवसांपासून परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महाकाळा, भगवाननगर, चुर्मापुरी व परिसरात रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.दरम्यान, या परिसरात मागील काही महिन्यांपासून १५ ते २० चो-या झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. यातील काही चोºया उघडकीस आल्या असून, काही चोऱ्यांचे तपास अद्यापही पोलिसांना लागले नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारी