शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

कपाशी खाल्ल्याने जनावरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:25 IST

जाफराबाद : यंदा कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कपाशी उपटण्यापूर्वी अनेक शेतकरी पिकांत जनावरे चरण्यासाठी सोडतात. ...

जाफराबाद : यंदा कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कपाशी उपटण्यापूर्वी अनेक शेतकरी पिकांत जनावरे चरण्यासाठी सोडतात. मात्र, बोंडबळीग्रस्त पीक खाल्ल्याने जनावरांचा मृत्यू होऊ लागल्याचे जाफराबाद परिसरातील घटनांवरून दिसून येत आहे.

यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातून पिके गेली आहेत. बोंडअळीमुळे कपाशी पिकाचेही नुकसान झाले आहे. कपाशी उपसून टाकण्यापूर्वी अनेक शेतकरी या कपाशी पिकात जनावरे चरण्यासाठी सोडतात. मात्र, बोंडअळीचा प्रादुर्भाव असलेले पीक जनावरांसाठी घातक ठरत आहे. वरखेड (ता. जाफराबाद) येथील शेतकरी गजानन उबाळे यांच्या म्हशीने बोंडअळीग्रस्त कपाशी खाल्ली होती. मात्र, बोंडअळीग्रस्त कपाशी खाणाऱ्या त्या म्हशीचा बुधवारी अचानक मृत्यू झाला. म्हशीचे निधन झाल्याने तिचा संभाळ करणारा राम हा धायमोकलून रडत होता. या घटनेत उबाळे यांचे मोठे नुकसान झाले आहे.

पशुधनाच्या विम्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यात शेतकरी आपली जनावरे कपाशी पिकात सोडत आहेत. थोडेही दुर्लक्ष झाले आणि जनावरांनी बोंडअळीयुक्त किंवा रासायनिक औषधी फवारलेली पिके खाल्ली तर मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे पिकात जनावरे सोडताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.

संजय मोरे,

प्रमुख, ग्रोव्हिजन गटशेती संघ