शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

कोरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

जालना : गत वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने सर्वसामान्य नागरिकांबरोबरच अंध व्यक्तींनाही मोठी कसरत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत ...

जालना : गत वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने सर्वसामान्य नागरिकांबरोबरच अंध व्यक्तींनाही मोठी कसरत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी शासनाला वारंवार लॉकडाऊन करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे सर्वचजण हैराण आहेत. लॉकडाऊन काळात अंध व्यक्तींचे जगणे मुश्किल बनले आहे. जालना येथील संजय सूर्यवंशी हे शहरातील चमन परिसरात खेळण्यांचे साहित्य विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. परंतु, मागील दाेन महिन्यांपासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू आहेत. त्यामुळे ते घरीच बसून आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. पती, मुलगा असा परिवार आहे. ते नातेवाईकांकडून उसनवारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.

जिल्ह्यात एकही अंध व्यक्ती पॉझिटिव्ह नाही. जालना जिल्ह्यात कोरोना धुमाकूळ घालत आहे. दिवसागणिक दररोज ६०० पेक्षा अधिक रुग्ण आढळत होते. असे असतानाही जिल्ह्यात एकाही अंध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

मदतीची मागणी

गेल्या वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातल्याने अंध व्यक्तींचे जगणे मुश्किल बनले आहे. शासनाने अंध व्यक्तींना मदत करावी, अशी मागणी अंध व्यकींकडून केली जात आहे.

कोरोनामुळे माझे कुटुंब अत्यंत हलाकीचे जीवन जगत आहे. कुटुंबात इतर कोणीही काम करत नाही. कोरोनाच्या अगोदर मंदिरांबाहेर फूल, हार विकण्याचे काम करीत होतो. परंतु, लॉकडाऊनमुळे मंदिरे बंद आहेत. त्यामुळे हातचे काम गेले आहे. उसनवारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.

- दत्ता मसुरे, अंबड

कोरोनामुळे सतत लॉकडाऊन होत आहे. दिव्यांगांचे जगणे अवघड बनले आहे. दिव्यांग पानटपरी, चहाचे हॉटेल चालवून, गोळ्या बिस्किटे विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. परंतु, सध्या लॉकडाऊनमुळे जगणेच अवघड बनले आहे. शासनाने दिव्यांगांना मदत करावी.

- अनिरुध्द म्हस्के, जालना

मी १०० टक्के डोळ्याने अंध आहे. कोरोनाच्या अगोदर लहान मुलांची खेळणी, गोळ्या, बिस्किटे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होतो. परंतु, आता कडक निर्बंध असल्याने घरीच बसावे लागत आहे. शासनाने आम्हाला मदत करावी.

- संजय सूर्यवंशी, नाहेगाव

कोरोनाच्या काळात अपंग व्यक्तींना जगणे अवघड बनले आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. दुसरीकडे शासनाकडूनही मदत केली जात नाही. शासन शिधापत्रिका धारकांना रेशन देत आहे. परंतु, दिव्यांग व्यक्तींना धान्य दिले जात नाही. याकडे लक्ष द्यावे.

- विठ्ठल चव्हाण, जिल्हाध्यक्ष, जालना, प्रहार अपंग क्रांती संघटना जालना