जालन्याजवळ झालेल्या अपघातात काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 00:16 IST2021-02-10T00:16:03+5:302021-02-10T00:16:53+5:30
दोन जण गंभीर जखमी; अतिदक्षता विभागात उपचार सुरू

जालन्याजवळ झालेल्या अपघातात काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसांचा मृत्यू
जळगाव: जालना - सिंदखेडराजा रस्त्यावर चार चाकी व ट्रक अपघातात कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आसिफ खान इस्माईल खान (रा.मुक्ताईनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुक्ताईनगर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव व अॕड. संतोष इंगळे (मेळसांगवे) गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
औरंगाबाद येथील कामकाज आटोपून तिघे कारने जालनामार्गे मुक्ताईनगरला परत येत असताना जालना- सिंदखेराजा रस्त्यावर हा अपघात झाला. आत्माराम जाधव व अॕड. संतोष इंगळे हे दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना जालना येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील यांच्या हॉस्पिटलसमोर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. आसिफ खान यांच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान घटनास्थळ व हॉस्पिटलकडे मित्रपरिवार व नातेवाईक रवाना झालेले आहेत.