शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

३० हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 00:24 IST

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या १२ वीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या १२ वीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. पहिलाच पेपर इंग्रजी विषयाचा आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज असल्याची माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली. जिल्ह्यातील ७३ केंद्रावर ही परीक्षा होणार असून, ३० हजार ८१४ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहे.परीक्षा केंद्रांवर सुविधा देण्याबरोबरच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेण्यात आली आहे. जिल्ह्यात ३० हजार विद्यार्थी ७३ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्तीसाठी ६ भरारी पथके नेमण्यात आली असून,१० केंद्र परिरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, रोडरोमिओंचा त्रास टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला असल्याचे माहिती शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी सांगितले. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. परीक्षेस जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी कॉपी करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.आठवीचे ३७४ तर पाचवीचे ४५५ विद्यार्थी अनुपस्थितलोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिक्षण विभागाच्यावतीने रविवारी आठवी व पाचवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. आठवीच्या ८३५२ पैकी ७९७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ३७४ विद्यार्थी अनुपस्थित होते. पाचवीच्या १०७८६ पैकी १०३३१ विद्यार्थ्यांची परीक्षेस उपस्थिती होती. ४५५ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.राज्य शासनाच्या वतीने पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. जालना जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने रविवारी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. १०० केंद्रावर पाचवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली. पेपर -१ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत घेण्यात आला. पेपर एकला १०७८६ पैकी १०३३१ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तर ४५५ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. पेपर २ ला १०७८६ पैकी १०३१६ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तर ४७० विद्यार्थी अनुपस्थित राहिले.७३ केंद्रावर आठवीची परीक्षा घेण्यात आली. पेपर १ ला ८३५२ पैकी ७९७८ विद्यार्थी उपस्थित होते. तर ३७४ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. पेपर २ ला ८३५२ पैकी ७९७६ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. ३७६ विद्यार्थ्यांची अनुपस्थिती होती. सर्वच केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली. यासाठी शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, उपशिक्षणाधिकारी खरात यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले. परीक्षा केंद्राबाहेर पालकांची मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी