शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
2
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
3
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
4
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
5
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
6
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
7
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
8
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
9
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
10
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
11
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
12
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
13
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
14
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
15
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
16
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
17
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
18
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
19
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?

३० हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 00:24 IST

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या १२ वीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या १२ वीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. पहिलाच पेपर इंग्रजी विषयाचा आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज असल्याची माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली. जिल्ह्यातील ७३ केंद्रावर ही परीक्षा होणार असून, ३० हजार ८१४ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहे.परीक्षा केंद्रांवर सुविधा देण्याबरोबरच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेण्यात आली आहे. जिल्ह्यात ३० हजार विद्यार्थी ७३ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्तीसाठी ६ भरारी पथके नेमण्यात आली असून,१० केंद्र परिरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, रोडरोमिओंचा त्रास टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला असल्याचे माहिती शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी सांगितले. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. परीक्षेस जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी कॉपी करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.आठवीचे ३७४ तर पाचवीचे ४५५ विद्यार्थी अनुपस्थितलोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिक्षण विभागाच्यावतीने रविवारी आठवी व पाचवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. आठवीच्या ८३५२ पैकी ७९७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ३७४ विद्यार्थी अनुपस्थित होते. पाचवीच्या १०७८६ पैकी १०३३१ विद्यार्थ्यांची परीक्षेस उपस्थिती होती. ४५५ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.राज्य शासनाच्या वतीने पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. जालना जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने रविवारी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. १०० केंद्रावर पाचवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली. पेपर -१ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत घेण्यात आला. पेपर एकला १०७८६ पैकी १०३३१ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तर ४५५ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. पेपर २ ला १०७८६ पैकी १०३१६ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तर ४७० विद्यार्थी अनुपस्थित राहिले.७३ केंद्रावर आठवीची परीक्षा घेण्यात आली. पेपर १ ला ८३५२ पैकी ७९७८ विद्यार्थी उपस्थित होते. तर ३७४ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. पेपर २ ला ८३५२ पैकी ७९७६ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. ३७६ विद्यार्थ्यांची अनुपस्थिती होती. सर्वच केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली. यासाठी शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, उपशिक्षणाधिकारी खरात यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले. परीक्षा केंद्राबाहेर पालकांची मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी