शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

शहरातील नर्सरी, केजीच्या २५ हजार मुलांचे पुढील वर्षही घरातच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:30 IST

जालना : पूर्वीच्या बालवाडी म्हणजेच आताच्या जमान्यातील नर्सरी अशी ओळख या शाळांची निर्माण झाली आहे. इंग्रजीचे महत्त्व वाढल्याने या ...

जालना : पूर्वीच्या बालवाडी म्हणजेच आताच्या जमान्यातील नर्सरी अशी ओळख या शाळांची निर्माण झाली आहे. इंग्रजीचे महत्त्व वाढल्याने या इंग्रजी शाळांची शहरासह ग्रामीण भागातील संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. परंतु गेल्या दीड वर्षापासून या शाळा बंद आहेत. त्या जूनमध्येही सुरू होतील की नाही, याबाबत शंका आहे.

जालना शहरात जवळपास ११४ पेक्षा अधिक लहान मोठ्या नर्सरी, केजीच्या शाळा आहेत. यामध्ये गेल्या वर्षभरापासून या शाळांची मैदाने आणि वर्ग हे मुलांच्या किलबिलाटाने गजबजलेच नाहीत. कोरोनामुळे मोठे नागरिक त्रस्त असताना लहान मुलांना शाळेत कसे पाठवायचे, या भीतीने देखील अनेकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश दिला नाही. त्यातच सरकारने देखील शाळा बंद ठेवल्याने या नर्सरी, केजी शाळांचे दरवाजे बंदच होते. जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होते. परंतु यंदा ही आशाही मावळण्याची शक्यता आहे. कारण कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विशेष करून या तिसऱ्या लाटेत लहान मुलांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असल्याने गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही या शाळा उघडतील अशी शक्यता धूसर आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाची मोठी अडचण निर्माण झाली असून, बच्चे कंपनीदेखील घरात बसून आता कंटाळली आहे.

मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम; ही घ्या काळजी

शाळांमध्ये विद्यार्थी लहानपणापासून गेल्यास त्यांच्या एकूणच शारीरिक आणि मानसिक वाढीमध्ये आमूलाग्र बदल होतात. एकमेकांच्या सहवासात आल्याने मुलांचे एकटेपण दूर होते. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवून जर या शाळा सुरू झाल्यातर सकारात्मक बाब म्हणावी लागेल.

- डॉ. संजय जगताप, मानसोपचार तज्ज्ञ

गेल्या वर्षभरापासून माझी मुलगी घरातच आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने त्यांच्या हसण्या, बागडण्यावर मर्यादा आल्या आहेत. तसेच त्यांच्या शैक्षणिक गुणत्तेवरही विपरित परिणाम होत आहे.

- जकी सौदागर

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. यामुळे माझी दोन्ही मुले घरीच आहेत. यंदा शाळा सुरू होण्याची आशा व्यक्त होत आहे. परंतु लहान मुलांनाच संसर्गाचा धोका जास्त असल्याचे पुढे येत असल्याने मुलांना शाळेत पाठवावे की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

- नंदू जावळे

पूर्वी बालवाडी आणि पहिली दुसरीच्या शाळा मराठीतच विद्यादान करणाऱ्या होत्या. परंतु काळानुरूप यात बदल झाले असून, गेल्या २५ वर्षात नर्सरी, केजी या शाळांना महत्त्व आले आहे. यातून विद्यार्थ्यांना इंग्रजीचे चटकन आकलन होते.

- खमर सुलताना, चालक

कोरोनामुळे नर्सरी, केजीच्या शाळा गेल्या दीड वर्षापासून उघडल्या नाहीत. आगामी शैक्षणिक वर्षातही अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांसह शाळा व्यवस्थापन त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांची मोठी अडचण निर्माण झााली.

- अलका गव्हाणे, चालक

मुलांना इंग्रजी यावे, या हेतूने सर्व पालकांचा ओढा आता केजी आणि नर्सरीकडे वळला आहे. असे असले तरी कोरोनाचा फटका या शाळांनाही बसल्याने मुले घरीच आहेत.

- रेखा चंद्रकांतराव देशपांडे