शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळातही अमृतवन फुललेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 01:20 IST

नगर पालिकेच्या वतीने शहरातील मोतीतलाव परिसरातील अमृतवनमध्ये ३० हजार झाडांची लागवड केली आहे. सध्या भीषण दुष्काळी परिस्थितीतही या झाडांमुळे अमृतवन फुललेले दिसत आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सततच्या अत्यल्प पावसामुळे वृक्षसंगोपनाची गरज निर्माण झाल्याने वृक्ष संवर्धनाची कास धरा, असे आवाहन शासनाकडून केले जात आहे. तर दुसरीकडे वन व महसूल विभागाच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यात दररोज हजारो झाडांची तोड होत आहे. याचा दुष्परिणाम म्हणून उष्णतेने सध्या उच्चांक गाठला आहे. यामुळे वृक्षाच्छादित क्षेत्रही घटत चालले आहे. शहरातील वृक्षाच्छादित क्षेत्र वाढावे, तसेच कारखान्याच्या धुरापासून प्रदूषण कमी व्हावे, यासाठी नगर पालिकेच्या वतीने शहरातील मोतीतलाव परिसरातील अमृतवनमध्ये ३० हजार झाडांची लागवड केली आहे. सध्या भीषण दुष्काळी परिस्थितीतही या झाडांमुळे अमृतवन फुललेले दिसत आहे.वाढत्या लोकसंख्येमुळे नवीन निर्माण होणाऱ्या वसाहती, वाढते रस्ते, औद्योगिक व्यवसाय विविध घटकांमध्ये जिल्ह्याचा विस्तार वाढत चालला आहे. या विस्ताराच्या प्रगतीसाठी आड येणा-या वृक्षांची कुठलीही परवानगी न घेता सर्रास कत्तल केली जात आहे. वृक्षांचे संवर्धन आणि वृक्षतोड रोखण्यासाठी वन विभाग आणि महसूल विभागाला करडी नजर ठेवावी लागते. या दोन्ही विभागाला आपआपल्या परीने क्षेत्र वाटुन देण्यात आले आहे. परंतु, या विभागातील अधिकारी, कर्मचारी याबाबत कुठलीही कारवाई करीत नसल्यामुळे याबाबत साशंकता निर्माण होत आहे. वनक्षेत्र कमी होत असल्याने तापमानही ४३ अंशांवर गेले आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आरा मशीन आहेत. या मशीनवर कोणत्या प्रकारचे वृक्ष कापणीसाठी येतात. त्या वृक्षांना मान्यता आहे की नाही, याची वनपालांना तपासणी करण्यासाठी जावे लागते. परंतु, बहुतांश वनपाल व नागरिकही वृक्षतोडीकडे गांभीर्याने पाहात नसल्यामुळे हा व्यवसायही दिवसेंदिवस फोफावत चालला आहे.दरम्यान, जालना शहरातील वनक्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी जालना नगर पालिकेच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे. शहरात वृक्षांची संख्या वाढविण्यासाठी नगर पालिकेने मोतीतलाव परिसरातील अमृतवनमध्ये २४० जातीच्या ३० हजार झाडांची २५ एकरमध्ये लागवड केली आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीतही ही झाडे जगविली जात आहे. यामुळे शहराच्या वैभवात काही प्रमाणात तरी भर पडत आहे.गुलाबी जालना म्हणून शहराची ओळख व्हावी, या उद्देशाने रेल्वे ट्रकच्या बाजूंनी दोन किलोमीटरपर्यंत फुलांची झाडे लावण्याचे काम करण्यात आले आहे. या उद्यानाला लागूनच मोती तलाव असल्यामुळे पाण्यासाठी जास्त गैरसोय होत नाही. हा परिसर वनौषधी उद्यानच नाही तर दुर्मिळ पशु-पक्षी या भागात स्थायिक होतील, या अनुषगाने आवश्यक ते वातावरणही तयार करण्यात आले आहे.शहरात वृक्षांची संख्या वाढावी, यासाठी पालिकेकडून प्रयत्न करण्यात येत असून, येणा-या काळात जालना शहरात ४० हजार झाडे लावण्यात येणार आहे. ही झाडे कुंडलिका नदीच्या बाजूला लावण्यात येणार असून, याचा फायदा शहरवासीयांना होणार आहे. दरम्यान, शहरातील प्रत्येक कुटुंबांनी एक झाड लावले तर शहरात ७५ हजार झाडांची लागवड होऊ शकते, अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी दिली. प्रत्येक कुटुंबाला झाडे देण्याचा प्रयत्नही नगर पालिकेच्यावतीने करण्यातयेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.विविध प्रकारच्या वृक्षांची लागवडया उद्यानात निंब, पिंपळ, वड, जांभूळ, निलगिरी, बाभूळ, चिकू, बदाम, चंदण, पेरू, आवळा, बोर, सीताफळ, डाळिंब, शेवरी, हादगा, पांगारा, शेवगा, साग, सादडा, पळस, करंज, सुबाभूळ, शिरीष, काशीद, खैद, सिसम, अकेशिया, रक्तचंदन, तामण, गावडा, मोह, अंकोल, कुमकुम, शेवरी, शेवगा, बांबू, निरगुडी, पांगारा, जाभूळ, रामफळ, आवळा, बोर आदी जातींची झाडे लावण्यात आली आहे.मोतीतलाव जवळ असल्यामुळे येथे अमृतवन तयार करण्यात आले आहे. तसेच या झाडांना पाणी देण्यासाठी येथे दोन बोअरही आहेत.सध्या या बोअरमध्ये पाणी नसल्याने ही झाडे जगविण्यासाठी मोतीतलावातील पाण्याचा उपयोग करण्यात येत आहे.

टॅग्स :World Environment DayWorld Environment DayJalana Muncipalityजालना नगरपरिषदNatureनिसर्गdroughtदुष्काळ