शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

दुष्काळातही अमृतवन फुललेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 01:20 IST

नगर पालिकेच्या वतीने शहरातील मोतीतलाव परिसरातील अमृतवनमध्ये ३० हजार झाडांची लागवड केली आहे. सध्या भीषण दुष्काळी परिस्थितीतही या झाडांमुळे अमृतवन फुललेले दिसत आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सततच्या अत्यल्प पावसामुळे वृक्षसंगोपनाची गरज निर्माण झाल्याने वृक्ष संवर्धनाची कास धरा, असे आवाहन शासनाकडून केले जात आहे. तर दुसरीकडे वन व महसूल विभागाच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यात दररोज हजारो झाडांची तोड होत आहे. याचा दुष्परिणाम म्हणून उष्णतेने सध्या उच्चांक गाठला आहे. यामुळे वृक्षाच्छादित क्षेत्रही घटत चालले आहे. शहरातील वृक्षाच्छादित क्षेत्र वाढावे, तसेच कारखान्याच्या धुरापासून प्रदूषण कमी व्हावे, यासाठी नगर पालिकेच्या वतीने शहरातील मोतीतलाव परिसरातील अमृतवनमध्ये ३० हजार झाडांची लागवड केली आहे. सध्या भीषण दुष्काळी परिस्थितीतही या झाडांमुळे अमृतवन फुललेले दिसत आहे.वाढत्या लोकसंख्येमुळे नवीन निर्माण होणाऱ्या वसाहती, वाढते रस्ते, औद्योगिक व्यवसाय विविध घटकांमध्ये जिल्ह्याचा विस्तार वाढत चालला आहे. या विस्ताराच्या प्रगतीसाठी आड येणा-या वृक्षांची कुठलीही परवानगी न घेता सर्रास कत्तल केली जात आहे. वृक्षांचे संवर्धन आणि वृक्षतोड रोखण्यासाठी वन विभाग आणि महसूल विभागाला करडी नजर ठेवावी लागते. या दोन्ही विभागाला आपआपल्या परीने क्षेत्र वाटुन देण्यात आले आहे. परंतु, या विभागातील अधिकारी, कर्मचारी याबाबत कुठलीही कारवाई करीत नसल्यामुळे याबाबत साशंकता निर्माण होत आहे. वनक्षेत्र कमी होत असल्याने तापमानही ४३ अंशांवर गेले आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आरा मशीन आहेत. या मशीनवर कोणत्या प्रकारचे वृक्ष कापणीसाठी येतात. त्या वृक्षांना मान्यता आहे की नाही, याची वनपालांना तपासणी करण्यासाठी जावे लागते. परंतु, बहुतांश वनपाल व नागरिकही वृक्षतोडीकडे गांभीर्याने पाहात नसल्यामुळे हा व्यवसायही दिवसेंदिवस फोफावत चालला आहे.दरम्यान, जालना शहरातील वनक्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी जालना नगर पालिकेच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे. शहरात वृक्षांची संख्या वाढविण्यासाठी नगर पालिकेने मोतीतलाव परिसरातील अमृतवनमध्ये २४० जातीच्या ३० हजार झाडांची २५ एकरमध्ये लागवड केली आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीतही ही झाडे जगविली जात आहे. यामुळे शहराच्या वैभवात काही प्रमाणात तरी भर पडत आहे.गुलाबी जालना म्हणून शहराची ओळख व्हावी, या उद्देशाने रेल्वे ट्रकच्या बाजूंनी दोन किलोमीटरपर्यंत फुलांची झाडे लावण्याचे काम करण्यात आले आहे. या उद्यानाला लागूनच मोती तलाव असल्यामुळे पाण्यासाठी जास्त गैरसोय होत नाही. हा परिसर वनौषधी उद्यानच नाही तर दुर्मिळ पशु-पक्षी या भागात स्थायिक होतील, या अनुषगाने आवश्यक ते वातावरणही तयार करण्यात आले आहे.शहरात वृक्षांची संख्या वाढावी, यासाठी पालिकेकडून प्रयत्न करण्यात येत असून, येणा-या काळात जालना शहरात ४० हजार झाडे लावण्यात येणार आहे. ही झाडे कुंडलिका नदीच्या बाजूला लावण्यात येणार असून, याचा फायदा शहरवासीयांना होणार आहे. दरम्यान, शहरातील प्रत्येक कुटुंबांनी एक झाड लावले तर शहरात ७५ हजार झाडांची लागवड होऊ शकते, अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी दिली. प्रत्येक कुटुंबाला झाडे देण्याचा प्रयत्नही नगर पालिकेच्यावतीने करण्यातयेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.विविध प्रकारच्या वृक्षांची लागवडया उद्यानात निंब, पिंपळ, वड, जांभूळ, निलगिरी, बाभूळ, चिकू, बदाम, चंदण, पेरू, आवळा, बोर, सीताफळ, डाळिंब, शेवरी, हादगा, पांगारा, शेवगा, साग, सादडा, पळस, करंज, सुबाभूळ, शिरीष, काशीद, खैद, सिसम, अकेशिया, रक्तचंदन, तामण, गावडा, मोह, अंकोल, कुमकुम, शेवरी, शेवगा, बांबू, निरगुडी, पांगारा, जाभूळ, रामफळ, आवळा, बोर आदी जातींची झाडे लावण्यात आली आहे.मोतीतलाव जवळ असल्यामुळे येथे अमृतवन तयार करण्यात आले आहे. तसेच या झाडांना पाणी देण्यासाठी येथे दोन बोअरही आहेत.सध्या या बोअरमध्ये पाणी नसल्याने ही झाडे जगविण्यासाठी मोतीतलावातील पाण्याचा उपयोग करण्यात येत आहे.

टॅग्स :World Environment DayWorld Environment DayJalana Muncipalityजालना नगरपरिषदNatureनिसर्गdroughtदुष्काळ