शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त उसाच्या गाळपासाठी कारखान्यांना उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST

वडीगोद्री/ अंकुशनगर : जिल्ह्यातील अतिरिक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे असून, कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यावर ...

वडीगोद्री/ अंकुशनगर : जिल्ह्यातील अतिरिक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे असून, कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यावर याबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील व शेजारील जिल्ह्यातील साखर कारखान्यांना उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.

या बैठकीस पालकमंत्री राजेश टोपे, साखर आयुक्तांचे प्रतिनिधी पांडुरंग शेळके, विशेष लेखा परीक्षक रशीद शेख यांच्यासह शेजारील जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सोमवारी ही बैठक घेण्यात आली. समर्थ कारखान्याच्या कार्यक्षेत्रात साडेसात लाख मेट्रिक टन ऊस अतिरिक्त आहे. शिवाय जिल्ह्यातही उसाचा अतिरिक्त प्रश्न गंभीर आहे. या उसाचे गाळप करण्यासाठी चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर बारामती अ‍ॅग्रोने दीड लाख मे. टन, रामेश्वर सहकारी कारखाना भोकरदन ५० हजार मे टन, गंगामैया अ‍ॅग्रोने १ लाख मे टन, छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग ५० हजार मे टन, मुक्ताईनगर शुगर्स ३० हजार मे टन, लक्ष्मी नरसिंह शुगर्स परभणी २५ हजार मे टन, जय महेश शुगर्स माजलगाव ३ लाख मे टन, समृद्धी व घृशनेश्वर शुगर्स २ लाख मे. टन व शरद शुगर्स पैठणने ४० हजार मे. टन याप्रमाणे उसाचे गाळप करावे, असे उद्दिष्ट देण्यात आले.

तोड यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे

उद्दिष्ट निश्चित झाले मात्र प्रत्यक्ष तोड यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश किती कारखाने पाळतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रत्यक्षात केवळ बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड कन्नड येथील कारखान्याची यंत्रणा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या कारखान्याच्या ५५ टोळ्या असून, ७० ट्रकमार्फत दररोज बाराशे मेट्रिक टन ऊस गाळपासाठी घेऊन जात आहे.