शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के मदतीचे वाटप; उर्वरित मदत वाटपाला मिळणार मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:26 IST

जालना : परतीचा पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा आणि अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी ...

जालना : परतीचा पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा आणि अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी राज्य शासनाकडून मदत म्हणून ५२,२२७.४६ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यातील अर्ध्या रकमेचे यापूर्वी पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात आले असून, आता दुसऱ्या टप्प्याचा निधी जिल्हा प्रशासनाला गुरुवारी मिळाला आहे.

निसर्गाच्या अवकृपेमुळे शेती करणे दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे. कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ पडत असल्यामुळे शेती करणे जिकिरीचे बनत चालले आहे. कधी नव्हे तो गतवर्षी वेळेवर पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षा उंचावल्या होत्या. वेळेवर जिल्ह्यात खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली. पिकांच्या वाढीप्रमाणे पाऊस येत राहिल्याने पिकेही चांगली आली होती; परंतु उडीद, मूग, सोयाबीन काढणीला येताच सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाले. यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासन स्तरावरून बाधित पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली होती. यानुसार पहिल्या टप्प्यात २६११३.७३ लाख रुपयांचे ५ लाख ५३ हजार ७६७ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते; परंतु ही पहिल्या टप्प्यातील मदत शेतकऱ्यांना कमी पडली होती. यातच गुरुवारी पुन्हा २६११३.७३ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला मिळाले असून, ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम सुरू झाले आहे.

शासन स्तरावरून मिळणारी मदत तोकडी

खरीप हंगामातील पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी शासन स्तरावरून देण्यात येणार मदत फार तोकडी आहे. या मदतीतून पिकांवर झालेला खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्यात यावी.

- भिकनराव वराडे, शेतकरी, नळणी