शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

१ कोटी ३५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:28 AM

नाफेडने हमीभावाने खरेदी केलेल्या सोयाबीन, मूग उडिदाच्या दुसºया टप्यातील १ कोटी ३५ लाख ६९ हजार रुपये ८९१ शेतक-यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नाफेडने हमीभावाने खरेदी केलेल्या सोयाबीन, मूग उडिदाच्या दुसºया टप्यातील १ कोटी ३५ लाख ६९ हजार रुपये ८९१ शेतक-यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे.जिल्ह्यातील आठ हमीभाव केंद्रावर नाफेडकडून ८९१ शेतक-यां कडून उडीद, मूग, आणि सोयाबीनची खरेदी केली होती. मात्र वेळेत शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येत नसल्याने शेतक-यांत संताप होता. जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे खरिपाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. असे असताना ८९२ शेतक-यांनी मूग, उडीद, आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री केली होती. उसनवारी आणि दुष्काळामुळे शेतक-याकडे खर्चासाठी पैसाच नसल्याने शेतकरी हैराण झाले होते. कारण शेतमाल खरेदी केल्यानंतर आठवड्याभरात रक्कम खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे नाफेड कडून सांगण्यात आले होते. मात्र दोन महिने होऊनही रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा होण्यास अडचणी येत होत्या. यामुळे जिल्हा मार्केटिंगच्या कार्यालयात शेतकरी चकरा मारत होते. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती बघता जिल्हा मार्केटिंग विभागाने पाठपुरावा करुन शनिवारी ८९१ शेतक-यांच्या बँक खात्यात १ कोटी ३५ लाख ६९ हजार ४९७ रुपये आॅनलाईन वर्ग केले आहे. ऐन दुष्काळात थकीत रक्कम मिळाल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले.२२६ शेतक-यांकडून ४४ लाख ४८ हजार किमतीच्या ७९४ क्विंटल उडदाची खरेदी करण्यात आली होती. ६२५ शेतक-यांकडून ११८२ क्विंटल मूग खरेदी केली होती. तर ३० शेतक-याकडून २५६ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली होती. ५ जानेवारीला सोयाबीनची तर ७ जानेवारीला मूग, उडदाची नाफेडने खरेदी बंद केली होती.हमीभावाने खरेदी केलेल्या शेतक-यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली आहे. एक शेतकºयाची रक्कम तांत्रिक अडचणीमुळे रखडली आहे. शेतकºयांना काही अडचणी आल्यास त्यांनी जिल्हा मार्केटिंग विभागाशी संपर्क करावा.- गजानन मगरे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी

टॅग्स :droughtदुष्काळfundsनिधीFarmerशेतकरी