शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Video : भारतानं उभारलेल्या अफगाणिस्तानच्या संसदेत बंदुकधारी तालिबानी; सभापतींच्या खुर्चीवरही बसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 20:49 IST

Afghanistan Taliban Crisis : बंदुकधारी तालिबानींनी केला भारतानं उभारलेल्या अफगाणिस्तानच्या संसदेत प्रवेश. सभापतींच्या खुर्चींवरही बसले. 

ठळक मुद्देबंदुकधारी तालिबानींनी केला भारतानं उभारलेल्या अफगाणिस्तानच्या संसदेत प्रवेश. सभापतींच्या खुर्चींवरही बसले. 

रविवारी तालिबाननंअफगाणिस्तानवर कब्जा केला. अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथे कब्जा केल्यानंतर देशाची संपूर्ण सूत्रं तालिबानच्या हाती जाणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. याचदरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनीदेखील देश सोडण्याचा निर्णय घेतला. येणाऱ्या काही दिवसांमध्ये अफगाणिस्तानमध्ये काय परिस्थिती असू शकेल आणि तालिबान देश कशाप्रकारे चालवू शकतो याची झलक नुकतीच दिसली. संसद ही लोकशाहीसाठी पवित्र मानली जाते. परंतु राष्ट्राध्यक्ष भवनानंतर आता तालिबानींनी अफगाणिस्तानच्या संसदेवरही कब्जा केला. तालिबानींनी हत्यारांसह संसदेत प्रवेश केला. इतकंच नाही, तर सभापतींच्या खुर्चीवरही ते बसले. या संसदेची उभारणी भारतानं केली होती. तसंच २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ससंद भवनाचं उद्घाटनही करण्यात आलं होतं. 

वजाहत काझमी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये काही बंदुकधारी तालिबानी अफगाणिस्तानच्या संसदेच्या आत फिरताना दिसत आहेत. इतकंच नाही तर त्यांच्यापैकी एक बंदुकीसह सभापतींच्या खुर्चीवरही बसताना दिसत आहे. त्यांच्या समोर असलेल्या खुर्च्यांवरही काही तालिबानी बसल्याचं दिसून येत आहे.  अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह बहुतांश भागावर रविवारी तालिबाननं कब्जा केला. अशाच परस्थितीत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमधील नागरिक तालिबानच्या भीतीनं अन्य देशांमध्ये शरण घेण्यास जात आहे. परंतु अशा परिस्थितीत अशरफ गनी यांच्या देश सोडल्यानं अनेक नागरिक नाराज झाले आहेत. 

गनी यांची भावूक पोस्ट"माझ्यासमोर आव्हानात्मक पर्याय होते. मला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि म्हणून मी देश सोडला आहे. तालिबानसमोर मला उभे ठाकायला हवे. देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी गेली २० वर्षे झटलो. देश सोडला नसता, तर देशवासीयांना घातक परिणामांना सामोरे जावे लागले असते. तालिबानने मला हटवले आहे. काबुलमधील सामान्य जनतेवर हल्ले करण्यासाठी ते आले आहेत. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असं गनी यांनी म्हटलं होतं.

काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असतं"मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असते तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं. आता तालिबान जिंकला आहे. आता तो अफगाण लोकांच्या सन्मान, मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. तालिबान एका ऐतिहासिक परीक्षेला सामोरे जात आहे. आता एकतर तो अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवेल, असं घनी यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानParliamentसंसदIndiaभारतTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडिया