शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धक्कादायक! ॲमेझॉन जंगलात अंदाधुंद वृक्षतोड; दोन देशांच्या क्षेत्रफळाइतके जंगल साफ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 16:42 IST

जगाला मिळणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी 20 टक्के ऑक्सिजन एकट्या ॲमेझॉनच्या जंगलातून निर्माण होते.

Amazon rainforest : पृथ्वीचे 'फुफ्फुस' अशी ओळख असलेल्या जगातील सर्वात मोठ्या ॲमेझॉन रेन फॉरेस्टबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 4 दशकांमध्ये ॲमेझॉन जंगलाने जर्मनी आणि फ्रान्सच्या क्षेत्रफळाइतके क्षेत्र गमावले आहे. याचे प्रमुख कारण जंगलतोड असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ॲमेझॉन जंगल पृथ्वीवरील हवामान संतुलन राखण्यात आणि ग्लोबल वार्मिंगशी लढण्यात सर्वात मोठी मदत करतात.

जगातील 9 देशांमध्ये पसरलेल्या ॲमेझॉनच्या जंगलांना पृथ्वीचे फुफ्फुस म्हणतात. जगाला मिळणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी 20 टक्के ऑक्सिजन एकट्या ॲमेझॉनच्या जंगलातून निर्माण होते. अॅमेझॉनची जंगले पृथ्वीवरील कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात, जे हवामान बदलाचे एक प्रमुख कारण आहे.

खाणकाम आणि शेतीसाठी अंदाधुंद वृक्षतोडनुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, खाणकाम आणि शेतीच्या उद्देशाने जंगलतोड केल्यामुळे अॅमेझॉनच्या जंगलाचे 12.5 टक्के क्षेत्र नष्ट झाले आहे. संशोधकांच्या मते, हे नुकसान 1985 ते 2023 दरम्यान झाले. खाणकाम, शेती आणि पशुधनासाठी अॅमेझॉन वनजमिनीच्या वापरामध्ये चिंताजनक वाढ झाल्याचेही या अभ्यासातून समोर आले आहे.

या 9 देशांमध्ये पसरले ॲमेझॉनचे 'रेन फॉरेस्ट' अॅमेझॉनचे जंगल ब्राझील, बोलिव्हिया, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला, गयाना, सुरीनाम आणि फ्रेंच गयानापर्यंत पसरलेले आहे. सुमारे 8 लाख 80 हजार चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले हे जंगल पृथ्वीचे तापमान संतुलित राखण्यात आणि वायू प्रदूषणाची पातळी कमी करण्यात मोठी भूमिका बजावते. संशोधकांच्या मते, अॅमेझॉनच्या जंगलतोडीमुळे मोठ्या प्रमाणात परिसंस्था नाहीशी झाली आहे. 

ॲमेझॉन जंगलांचा ऱ्हास मोठा धोका इन्स्टिट्यूट ऑफ द कॉमन गुड, या अभ्यासात सहभागी झालेल्या पेरूतील संस्थेच्या सॅन्ड्रा रिओ कासारेस म्हणतात की, जंगले गमावल्याने वातावरणात अधिक कार्बन उत्सर्जन होते आणि यामुळे हवामान आणि पर्जन्य चक्रांचे नियमन करणारी संपूर्ण परिसंस्था विस्कळीत होते. ॲमेझॉनच्या जंगलातून लाखो वनस्पती नष्ट होण्याचा थेट संबंध दक्षिण आफ्रिकन देशांमध्ये उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती आणि जंगलातील आगीशी आहे.

ॲमेझॉन नदीच्या पातळीतही घट झाली वर्ल्ड वेदर ॲट्रिब्यूशन नेटवर्क ऑफ सायन्सने रविवारी सांगितले की, वातावरणातील बदलामुळे ॲमेझॉन आणि पॅन्टॅनल पाणथळ भागात आग लागण्याचा धोका आणि तीव्रता वाढत आहे, ज्यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइड मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होत आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत जग जीवाश्म इंधन जाळत राहील, तोपर्यंत ॲमेझॉन आणि पँटानल आर्द्र प्रदेशात आग लागण्याचा धोका वाढतच जाईल. गेल्या काही दशकांमध्ये ॲमेझॉनच्या जंगलातून उगम पावणाऱ्या नद्यांच्या पातळीतही घट झाली आहे. त्यामुळे किनारपट्टीवर वसलेल्या भागात राहणाऱ्या सुमारे 4 कोटी 70 लाख लोकांच्या रोजीरोटीला धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :forestजंगलInternationalआंतरराष्ट्रीयEarthपृथ्वी