शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

हे पुर्ण कुटूंब घेतंय लखपती भिकाऱ्याचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 6:29 PM

या भिकाऱ्याचं सापडणं त्या कुटूंबासाठी फार महत्त्वाचं झालं आहे आणि सर्व त्याचा कसून शोध घेत आहेत.

ठळक मुद्देउत्तराखंडमधील हरिद्वारच्या रानीपूर कोतवाली इथं हा प्रकार घडलाय. या इसमाने त्याच्या वडिलांना न विचारता परस्पर ही गादी दिल्याने खूप मोठा घोळ झाला. हा प्रकार समोर आल्यावर लगेच हे कुटुंब त्या मंदिरात गेले ज्या ठिकाणी तो भिकारी बसलेला असायचा.

हरिद्वार -  नशिबात असेल तर एखादा भिकारी एका रात्रीत लखपती बनू शकतो. यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर हरिद्वारमध्ये घडलेली घटना तुम्ही ऐेकायलाच हवी. हरिद्वार येथे एक भिकारी एका रात्रीत तब्बल ४० लाखांचा मालक बनलाय. यासाठी त्याने खूप परिश्रम केले वगैरे अशातला भाग नाही किंवा त्याला लॉटरी लागली आहे, अशातलाही भाग नाही. पण तरीही तो लखपती बनला आहे.

आणखी वाचा - पोलिसांना पुशअप्स मारताना पाहून कुत्र्यालाही राहवलं नाही

उत्तराखंडमधील हरिद्वारच्या रानीपूर कोतवाली इथं हा चमत्कार घडलाय. इथल्या एका इसमाने कनखल येथील एका भजन मंदिराबाहेर बसलेल्या एका भिकाऱ्याला एक जुनी गादी देऊ केली. या इसमाने त्याच्या वडिलांना न विचारता परस्पर ही गादी दिल्याने खूप मोठा घोळ झाला. या गादीमध्ये तब्बल ४० लाख होते. आपल्या आयुष्याची जमापूंजी साठवून त्यांनी या गादीत हे पैसे लपवून ठेवले होते. मात्र त्यांच्या मुलाने जुनी गादी समजून ती गादी भिकाऱ्याला देऊ केली. त्यामुळे साहजिकच हे कुटुंब आता त्या भिकाऱ्याच्या शोधात आहे. हा प्रकार समोर आल्यावर लगेच हे कुटुंब त्या मंदिरात गेले ज्या ठिकाणी तो भिकारी बसलेला असायचा. मात्र ते त्या भिकाऱ्याच्या शोधात तिथे गेले असता त्यांना तो तिथे सापडला नाही. त्यांनी त्या परिसरात त्याला जंग-जंग पछाडलं. सगळीकडे चौकशी केली, मात्र तो काही सापडला नाही.

आणखी वाचा - अजब ! फुलांचं नुकसान केल्याने पोलिसांनी गाढवांनाच केली अटक, चार दिवस कारागृहात ठेवलं डांबून

शेवटी तीन दिवसांनंतर तिथे तो भिकारी अखेर सापडला. आता आपले ४० लाख परत मिळणार या आशेने ते कुटुंब त्या भिकाऱ्याकडे गेलं. पण त्यांचा तिथं पुन्हा हिरमोड झाला. त्या भिकाऱ्याने ती गादी काही रुपयांत दुसऱ्या भिकाऱ्याला विकली होती. झाली की नाही पंचाईत. आता हे कुटुंब त्या दुसऱ्या भिकाऱ्याच्या शोधात आहे. याविषयी त्यांनी पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलिसांनाही या भिकाऱ्याबद्दल काहीच माहित नाही. त्यामुळे आता ४०लाखासाठी त्या नव्या भिकाऱ्याला शोधण्याचं खूप मोठं आव्हान या कुटुंबाकडे आहे. पण ज्या इसमाला हे ४० लाख सापडले आहेत, त्या इसमाचं आयुष्यच नक्कीच पालटलं असेल, यात काहीच शंका नाही. आहे की नाही रंजक घटना. एका रात्रीत श्रीमंत होण्यासाठी लोक लॉटरी वगैरे काढतात. पण ध्यानीमनी नसतानाही जर कोणाला अशी लॉटरी लागली तर आश्चर्यच वाटेल ना.

सौजन्य - http://medianp.net

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIndiaभारत