शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

धक्कादायक! जम्मू-काश्मीरमध्ये सशस्त्र समूहांकडून अल्पवयीनांची भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 02:15 IST

माओवादी समूहांनी शस्त्रास्त्रे व आयईडी हाताळण्यासाठी छत्तीसगढ व झारखंडमध्ये १२ वर्षांपर्यंतच्या बालकांना जबरदस्तीने भरती केले आहे. ते कधी कधी त्यांचा वापर मानवी ढाल म्हणूनही करतात.

वॉशिंग्टन : जम्मू-काश्मीरमध्ये सरकारविरोधी कारवायांसाठी सशस्त्र समूह १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना भरती करून घेतात व त्यांचा वापर करतात, असा धक्कादायक अहवाल अमेरिकेने तयार केला आहे. विदेश मंत्रालयाचा ‘२०२० ट्रॅफिकिंग इन पर्सन’ हा अहवाल विदेशमंत्री माईक पॉम्पिओ यांनी जारी केला आहे. यात म्हटले आहे की, माओवादी समूहांनी शस्त्रास्त्रे व आयईडी हाताळण्यासाठी छत्तीसगढ व झारखंडमध्ये १२ वर्षांपर्यंतच्या बालकांना जबरदस्तीने भरती केले आहे. ते कधी कधी त्यांचा वापर मानवी ढाल म्हणूनही करतात.अहवालानुसार, भारताने २०१९ मध्ये मानवी तस्करी संपवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले; परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अहवालात म्हटले आहे की, राज्येतर सशस्त्र समूह जम्मू-काश्मीरमध्ये थेट सरकारविरोधी कारवाया करण्यासाठी १४ वर्षांपर्यंतच्या किशोरवयीनांना सतत भरती करीत आहेत व त्यांचा वापर करीत आहेत. पूर्वेत माओवादी समूहांशी संबंधित काही महिला व मुलींनी सांगितले की, माओवादी तळांमध्ये लैंगिक शोषणही केले जाते. नक्षली समूहांनी पद्धतशीरपणे बालकांची भरती केली व त्यांचा वापर केला.तस्करी रोखण्यासाठी भारताने पावले उचललीभारताने मानवी तस्करी रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली; परंतु न्यूनतम मानक पूर्ण केले नाहीत. त्यामुळे भारताला दुसऱ्या श्रेणीत ठेवले आहे. या अहवालात पाकिस्तानचा दर्जा कमी करून त्या देशाला श्रेणी दोनच्या निगराणी यादीत ठेवली आहे. कारण तेथील सरकारने याबाबत योग्य पावले उचलली नाहीत. या यादीत चीनचे नाव सर्वांत खाली म्हणजे तिसºया श्रेणीत आहे. कारण त्या देशाच्या सरकारने मनवी तस्करी रोखण्यासाठी कोणतेही खास प्रयत्न केले नाहीत. अमेरिकेचे विदेशमंत्री माईक पॉम्पिओ यांनी अमेरिकेचे राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या व व्हाईट हाऊसची शीर्ष सल्लागार इवांका ट्रम्प यांच्या उपस्थितीत हा अहवाल जारी केला. त्यावेळी पॉम्पिओ म्हणाले की, चीनची कम्युनिस्ट पार्टी व सरकारी उपक्रमाने नागरिकांना बेल्ट आणि रोड योजनेत अत्यंत वाईट स्थितीत काम करण्यासाठी बाध्य केले.>एनआयएला आंतरराज्यीय मानवी तस्करीच्या चौकशीचे अधिकारमानवी तस्करी संपवण्यासाठी भारताने मानक पूर्ण केले नाहीत; परंतु त्या देशाने त्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यामुळे भारताला दुसºया श्रेणीत कायम ठेवण्यात आले आहे. बिहारमध्ये सरकारी मदतप्राप्त एका आश्रयगृहाच्या प्रकरणात आरोपींविरुद्ध कडक पावले उचलण्यात आली.या प्रकरणात राज्य सरकारच्या ३ अधिकाऱ्यांसह १९ जणांना दोषी ठरवण्यात आले होते. माजी आमदारासह १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. मानवी तस्करीविरोधी विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सर्व ७३२ जिल्ह्यांत पोलिसांच्या मानव तस्करविरोधी शाखेचा विस्तार करण्यासाठी निधीची तरतूद केली जात आहे. राष्टÑीय तपास यंत्रणेला (एनआयए) आंतरराज्यीय मानव तस्करीची चौकशी करण्याचे अधिकार दिलेले आहेत.

टॅग्स :terroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला