शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! जम्मू-काश्मीरमध्ये सशस्त्र समूहांकडून अल्पवयीनांची भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 02:15 IST

माओवादी समूहांनी शस्त्रास्त्रे व आयईडी हाताळण्यासाठी छत्तीसगढ व झारखंडमध्ये १२ वर्षांपर्यंतच्या बालकांना जबरदस्तीने भरती केले आहे. ते कधी कधी त्यांचा वापर मानवी ढाल म्हणूनही करतात.

वॉशिंग्टन : जम्मू-काश्मीरमध्ये सरकारविरोधी कारवायांसाठी सशस्त्र समूह १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना भरती करून घेतात व त्यांचा वापर करतात, असा धक्कादायक अहवाल अमेरिकेने तयार केला आहे. विदेश मंत्रालयाचा ‘२०२० ट्रॅफिकिंग इन पर्सन’ हा अहवाल विदेशमंत्री माईक पॉम्पिओ यांनी जारी केला आहे. यात म्हटले आहे की, माओवादी समूहांनी शस्त्रास्त्रे व आयईडी हाताळण्यासाठी छत्तीसगढ व झारखंडमध्ये १२ वर्षांपर्यंतच्या बालकांना जबरदस्तीने भरती केले आहे. ते कधी कधी त्यांचा वापर मानवी ढाल म्हणूनही करतात.अहवालानुसार, भारताने २०१९ मध्ये मानवी तस्करी संपवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले; परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अहवालात म्हटले आहे की, राज्येतर सशस्त्र समूह जम्मू-काश्मीरमध्ये थेट सरकारविरोधी कारवाया करण्यासाठी १४ वर्षांपर्यंतच्या किशोरवयीनांना सतत भरती करीत आहेत व त्यांचा वापर करीत आहेत. पूर्वेत माओवादी समूहांशी संबंधित काही महिला व मुलींनी सांगितले की, माओवादी तळांमध्ये लैंगिक शोषणही केले जाते. नक्षली समूहांनी पद्धतशीरपणे बालकांची भरती केली व त्यांचा वापर केला.तस्करी रोखण्यासाठी भारताने पावले उचललीभारताने मानवी तस्करी रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली; परंतु न्यूनतम मानक पूर्ण केले नाहीत. त्यामुळे भारताला दुसऱ्या श्रेणीत ठेवले आहे. या अहवालात पाकिस्तानचा दर्जा कमी करून त्या देशाला श्रेणी दोनच्या निगराणी यादीत ठेवली आहे. कारण तेथील सरकारने याबाबत योग्य पावले उचलली नाहीत. या यादीत चीनचे नाव सर्वांत खाली म्हणजे तिसºया श्रेणीत आहे. कारण त्या देशाच्या सरकारने मनवी तस्करी रोखण्यासाठी कोणतेही खास प्रयत्न केले नाहीत. अमेरिकेचे विदेशमंत्री माईक पॉम्पिओ यांनी अमेरिकेचे राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या व व्हाईट हाऊसची शीर्ष सल्लागार इवांका ट्रम्प यांच्या उपस्थितीत हा अहवाल जारी केला. त्यावेळी पॉम्पिओ म्हणाले की, चीनची कम्युनिस्ट पार्टी व सरकारी उपक्रमाने नागरिकांना बेल्ट आणि रोड योजनेत अत्यंत वाईट स्थितीत काम करण्यासाठी बाध्य केले.>एनआयएला आंतरराज्यीय मानवी तस्करीच्या चौकशीचे अधिकारमानवी तस्करी संपवण्यासाठी भारताने मानक पूर्ण केले नाहीत; परंतु त्या देशाने त्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यामुळे भारताला दुसºया श्रेणीत कायम ठेवण्यात आले आहे. बिहारमध्ये सरकारी मदतप्राप्त एका आश्रयगृहाच्या प्रकरणात आरोपींविरुद्ध कडक पावले उचलण्यात आली.या प्रकरणात राज्य सरकारच्या ३ अधिकाऱ्यांसह १९ जणांना दोषी ठरवण्यात आले होते. माजी आमदारासह १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. मानवी तस्करीविरोधी विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सर्व ७३२ जिल्ह्यांत पोलिसांच्या मानव तस्करविरोधी शाखेचा विस्तार करण्यासाठी निधीची तरतूद केली जात आहे. राष्टÑीय तपास यंत्रणेला (एनआयए) आंतरराज्यीय मानव तस्करीची चौकशी करण्याचे अधिकार दिलेले आहेत.

टॅग्स :terroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला