शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

पाकिस्तान ISIS च्या दहशतवाद्यांना टेरर फंडिंग करतं; सबळ पुरावे असल्याचा अफगाणिस्तानचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2019 12:27 PM

भारतासोबत चांगले संबंध असल्याने पाकिस्तान त्याचा राग अफगाणिस्तानवर काढत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

काबूल - अफगाणिस्तानमध्ये येत्या 28 सप्टेंबरला राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. यादरम्यान अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार अमरुल्लाह सलेह यांनी दहशतवादी संघटना इसिसचे पाकिस्तानसोबत संबंध असल्याचा दावा केला आहे. पाकिस्तान आयएसआयएस दहशतवाद्यांना फंडिंग करतं याचे सख्त पुरावे अफगाणिस्तानकडे आहेत असं त्यांनी सांगितले आहे. 

अफगाणिस्तानचे गृहमंत्री आणि माजी गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख राहिलेले अमरुल्लाह सलेह यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना हा दावा केला आहे. अमरुल्लाह सलेह यांनी सांगितले की, काबुलमध्ये अलीकडेच एका आयएसआयएसआयच्या दहशतवाद्याला पकडले. त्याच्या चौकशीदरम्यान या गोष्टीसमोर आल्या आहेत. पाकिस्तान आयएसआयएस फंडिंग करते असं चौकशीतून समोर आलं आहे. दहशत पसरविण्यासाठी त्यांना पाकिस्तानकडून हत्यारं पुरविण्यात येतात. याचे पुरावे आमच्याकडे आहेत असं अमरुल्लाह यांनी सांगितले. 

तसेच अमरुल्लाह सलेह यांनी भारताने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. अफगाणिस्तान याचे भारतासोबत चांगले संबंध असल्याने पाकिस्तान त्याचा राग अफगाणिस्तानवर काढत असल्याचा आरोपही त्यांनी केला. जम्मू काश्मीर हा भारताचा अंतर्गत भाग आहे. त्यामुळे कलम 370 हटविण्याचा निर्णय भारताचा अंतर्गत मामला आहे. या मुद्द्यावर पाकिस्तानला आक्षेप घेण्याची गरज नव्हती. तसेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हा प्रश्न घेऊन जाण्याला अर्थ नाही असा टोला सलेह यांनी पाकिस्तानला लगावला आहे. 

पाकिस्तान काश्मीर मुद्दा अफगाणिस्तानशी जोडत आहे त्याचा आम्ही विरोध करतो. सैरभैर झालेला पाकिस्तान अफगाणिस्तानशी बदला घेण्याची भाषा करतो यालाच दहशतवाद म्हणतात. दहशतवादाचा रस्ता सोडून मुख्य प्रवाहात येण्यासाठी तालिबानला ऑफर दिली मात्र त्यांनी इन्कार केला आहे. कारण त्यांना माहिती आहे की, दहशतवादी निवडणूक लढवू शकत नाही अन् कोणतीही जागा जिंकू शकत नाहीत. त्यामुळे तालिबानला सक्रीय राजकारणात आणणे कठिण असल्याचं अमरुल्लाह सलेह यांनी सांगितले. त्याचबरोबर अफगाणिस्तान भारताला खरा मित्र मानते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अफगाणिस्तानशी आणखी चांगले संबंध व्हावेत अशीच इच्छा आहे. भारतासोबतची मैत्री आणखी मजबूत व्हावी असंही अमरुल्लाह सलेह यांनी सांगितले.  

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानISISइसिसterroristदहशतवादीPakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर