शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 17:24 IST

Pakistan Nuclear Weapons: ऑपरेशन सिंदूरमुळे ओढवलेल्या जबरदस्त नामुष्कीनंतरही पाकिस्तान सुधरण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाही आहेत. आता पाकिस्तानने भारतासमोर आव्हान उभं करण्यासाठी अण्वस्त्रांबाबत भयंकर डाव आखण्याच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्य दलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळेपाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढवली होती. या मोहीमेच्या सुरुवातीला भारतानेपाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. तर नंतर पाकिस्तानच्या प्रमुख हवाई तळांना लक्ष्य केले होते. त्यामुळे पाकिस्तानला हतबल होऊन युद्धविरामासाठी विनवणी करावी लागली होती. मात्र या जबरदस्त नामुष्कीनंतरही पाकिस्तान सुधरण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाही आहेत. आता पाकिस्तानने भारतासमोर आव्हान उभं करण्यासाठी अण्वस्त्रांबाबत भयंकर डाव आखण्याच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.

अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या गोपनीय अहवालानुसार पाकिस्तान त्याच्याकडील अण्वस्त्रांच्या साठ्याचं वेगाने आधुनिकीकरण करत आहे. तसेच पाकिस्तान भारताला आपल्या अस्तित्वासाठी मोठा धोका मानत आहे. ही रणनीती पाकिस्तानची लष्करी विचारसणी आणि सीमेवरील त्यांच्या आक्रमकतेला दर्शवत आहे. या रिपोर्टमधील उल्लेखानुसार पाकिस्तान मुख्यत्वेकडून चीनकडून मिळणाऱ्या आर्थिक आणि लष्करी मदतीवर अवलंबून आहे.  चीनकडून मिळणारी साधनसामुग्री आणि तांत्रिक मदतीच्या आदारावर पाकिस्तान आपल्या लष्करी सामर्थ्यासोबतच आण्विक ताकदीचाही विस्तार करत आहे.

तज्ज्ञांच्या मते, चीन आणि पाकिस्तानमधील ही आघाडी भारतासाठी सामरिकदृष्ट्या दुहेरी संकट निर्माण करत आहे. एकीकडे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून येत असलेला दबाव आणि दुसरीकडे पाकिस्तानचा आण्विक ताकद वाढवण्याचा आणि सीमेपलीकडून अस्थिरता निर्माण करण्याचा डाव भारताचं टेन्शन वाढवणारा आहे.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndiaभारत