शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पाकिस्तान पुन्हा तोंडघशी, आपली दहशतवादी कृत्ये भारताच्या माथी मारण्याचा डाव फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 09:03 IST

पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. भारताला बदनाम करण्याचा पाकिस्तानचा डाव फसला.

नवी दिल्ली - पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. गेल्या वर्षी पाकिस्ताननं यूएनमध्ये भारताला घेरण्यासाठी पॅलेस्टाईनमधील फोटो दाखवत, संबंधित फोटो काश्मीरमध्ये भारताकडून होणाऱ्या अत्याचाराचा पुरावा असल्याचा कांगावा केला होता. यानंतर भारतानं पाकिस्तानचा खोटारडा चेहरा जगासमोर आणला. पाकिस्तान पुन्हा तिच चूक करत आहे. कहर म्हणजे यावेळेस स्वतःकडूनच पसरवला जाणार दहशतवाद भारताचा असल्याच्या उलट्या बोंबा पाकिस्तानकडून मारल्या जात आहेत.  

'जम्मू काश्मीरमध्ये भारताकडून होणार अत्याचार' या शीर्षकांतर्गत 20,000 पानांचे 20 पोस्टल स्टॅम्प पाकिस्तानकडून छापण्यात आले आहेत. या स्टॅम्पमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन कमांडर बुरहान वानीचाही समावेश आहे. संतापजनक बाब म्हणजे पाकिस्ताननं त्याला शहीद असे म्हटलं आहे. पण हा कांगावा करताना पाकिस्ताननं मोठी चूक केली आहे. काश्मिरी पंडित आणि शीखांवर पाकिस्ताननं केलेले हल्ले भारताकडून करण्यात आल्याचा खोटा दावा केला आहे. मात्र सत्य जगजाहीर आहे. आपली दहशतवादी कृत्ये भारताच्या माथी मारण्याचा पाकिस्तानचा डाव फसला आहे.

काश्मीरमधील एका संघटनेनं यूएन सेक्रेटरी जनरलसोबत पत्रव्यवहार करत अशाच एका स्टॅम्पबाबतचे सत्य उघड केले. या स्टॅम्पमध्ये पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांमधील भारतीय पीडितांचे फोटो आहेत. यूएनमध्ये तक्रार करणाऱ्या संघटनेनं लिहिले आहे की, 'आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. केवळ आमचे अस्तित्व राखण्याचीच नाही तर पाकिस्तान समर्थित दहशतावादाचा प्रभाव रोखण्याचीही जबाबादारी तुमच्यावर आहे. शिवाय, पाकिस्तानकडून जारी करण्यात आलेले हे स्टॅम्प मागे घेण्यात यावेत.'

पाकिस्तानी मीडियानुसार, हे स्टॅम्प छापण्याची कल्पना कोणाची होती, याबाबत ठोस अशी माहिती नाही. मात्र या प्रस्तावाला सुरुवातीला माहिती व प्रसारण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि पीएमओकडून मंजुरी देण्यात आली होती.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतImran Khanइम्रान खानTerrorismदहशतवाद