"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 08:53 IST2025-06-20T08:48:56+5:302025-06-20T08:53:03+5:30

पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी कबुली दिली आहे.

Pakistan Deputy Prime Minister Ishaq Dar has made a big confession regarding India Operation Sindoor | "तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत

"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत

Operation Sindoor: पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानचा चेहरा जगासमोर आला. आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरबद्दल मोठी कबुली दिली आहे.  भारताने नूरखान आणि शोरकोट हवाई तळांवर आणि इतर ठिकाणी हल्ला केल्यानंतर आम्ही युद्धबंदीला सहमती दर्शवल्याचे पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनी कबूल केले आहे. युद्धबंदींच्या प्रश्नावर इशाक दार यांनी सौदी अरेबियाचे प्रिन्स फैसल यांचाही उल्लेख केला.

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानातील नऊ मोठमोठे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये काही भारतीयांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतानेही पाकिस्तानला प्रत्युत्तर देत हल्ला केला. मात्र मोठ्या प्रमाणात  नुकसान झाल्याने पाकिस्तानने संघर्ष थांबवण्याची विनंती भारताकडे केली.

ऑपरेशन सिंदूरमुळे अणुबॉम्ब हल्ल्याची धमक्या देणाऱ्या पाकिस्तानला भारतासमोर गुडघे टेकावे लागले आणि युद्धबंदीची विनंती करावी लागली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफपासून मुल्ला मुनीरपर्यंत सर्वांनी ते मान्य केले आहे. आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनीही युद्धबंदीची विनंती पाकिस्ताननेच केल्याची कबुली दिली. या युद्धबंदीसाठी पाकिस्तानने अमेरिकाच नाही तर सौदी अरेबियाचीही मदत घेतली होती.

"भारताने रावळपिंडीतील नूर खान आणि शोरकोट हवाई तळांवर हल्ला केला. यामुळे पाकिस्तानचा बदला घेण्याची योजना उध्वस्त झाली. भारताच्या हल्ल्याच्या ४५ मिनिटांतच सौदी राजकुमार फैसल बिन सलमान यांनी त्यांना फोन करून विचारले की, मी जयशंकर यांच्याशी बोलून पाकिस्तान युद्धबंदीसाठी तयार आहे हे सांगू का? मी लगेच यावर सहमती दर्शवली आणि हो म्हटले, कृपया जयशंकर साहेबांना फोन करा आणि त्यांना सांगा की आम्हाला युद्धबंदी हवी आहे," असं  इशाक दार यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं.

दरम्यान, भारत व पाकिस्तानमधील दोन अत्यंत बुद्धिमान नेत्यांमुळे मागील महिन्यात दोन्ही देशांतील संघर्ष थांबला, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. मात्र, ते नेते कोण हे ट्रम्प यांनी स्पष्ट केले नाही. संघर्ष थांबविण्यासाठी केलेल्या कामगिरीमुळेच मुनीर यांना व्हाइट हाउसमध्ये खास मेजवानी दिली, असेही ट्रम्प म्हणाले.
 

Web Title: Pakistan Deputy Prime Minister Ishaq Dar has made a big confession regarding India Operation Sindoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.