शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

बुरहान वानी टपाल तिकिटावर, दहशतवाद्यांचा 'शहीद' म्हणून गौरव; पाकिस्तानचं शेपूट वाकडंच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 11:36 AM

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चर्चेसाठी पत्र पाठवलं आहे. पण दुसरीकडे, त्यांच्या टपाल खात्यानं दहशतवाद्यांच्या नावाने टपाल तिकिटं छापली आहेत.

इस्लामाबादः 'हम नही सुधरेंगे' हेच पाकिस्तानच ब्रीद असल्याचं त्यांच्या टपाल खात्यानं पुन्हा दाखवून दिलं आहे. काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्करानं कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांना शहीद ठरवून, बुरहान वानी आणि त्यांच्या साथीदारांच्या नावे टपाल तिकिटं काढून त्यांनी आपल्या 'नापाक' वृत्तीचंच दर्शन घडवलं आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चर्चेसाठी पत्र पाठवलं आहे. त्यांचा हा पवित्रा आश्चर्याचा धक्का देणाराच आहे. परंतु, उशिरा का होईना, शहाणपण सुचलं बुवा, अशी प्रतिक्रिया भारतीय व्यक्त करताहेत. या पत्राची बातमी येऊन काही तास उलटत नाहीत, तोच पाकिस्तानच्या टपाल खात्याने छापलेली २० नवी तिकिटं समोर आली आहेत. त्यावर जम्मू-काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे फोटो आहेत. त्यांचा उल्लेख पीडित असा करून त्यांनी आपला भारतद्वेष पुन्हा दाखवला आहे. 

काश्मीरमधील जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीपासून अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या हेतूने ही तिकिटं छापल्याचं टपाल खात्याच्या एका अधिकाऱ्यानं इंग्रजी वृत्तपत्राला सांगितलं. ८ जुलै २०१६ रोजी अनंतनागमधील चकमकीत ठार झालेला दहशतवादी बुरहान वानीचा उल्लेख या तिकिटावर 'फ्रीडम आयकॉन' असा केला आहे. रासायनिक शस्त्रांचा वापर, पॅलेट गनचा वापर, सामूहिक कब्र असे शब्दही या तिकिटांवर आहेत. भारतीय लष्कर काश्मीरमधील जनतेवर किती अत्याचार करतंय, असा आभास त्यातून निर्माण करायचा आहे. 

परंतु, भारताला बदनाम करण्याची ही खेळी पाकिस्तानवरच उलटू शकते. दहशतवादाला खतपाणी घालण्याचं, दहशतवाद्यांना आश्रय देण्याचं काम पाकिस्तान करत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. आता दहशतवाद्यांच्या नावाने टपाल तिकिटं काढून त्यांनी स्वतःच आपल्या कुकर्मांची कबुली दिली आहे, स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीर