शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
3
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
4
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
5
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
6
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
7
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
8
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
9
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
10
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
11
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
12
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
13
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
14
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
15
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
16
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
17
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
18
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
19
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
20
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात

भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 09:46 IST

भारताने केलेल्या हल्ल्यात ३१ लोकांचा मृत्यू झाला असून ५७ जण जखमी आहेत. हल्ल्यानंतर पाकिस्तानातील विमान सेवा खंडीत करण्यात आली आहे. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतानेऑपरेशन सिंदूर हाती घेतले. यात भारतानेपाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद, लश्कर ए तय्यबा या संघटनेचे ९० हून अधिक दहशतवादी ठार झाले. भारताच्या या स्ट्राईकनंतर पाकिस्तानात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. त्यात पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी कांगावा करण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या ८० लढाऊ विमानांनी हा हल्ला केला असं शरीफ यांनी म्हटलं.

जनतेला संबोधित करताना पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले की, भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानी सैन्य तयार आहे. मंगळवारी रात्री झालेल्या हल्ल्यात भारताचे ८० लढाऊ विमान सहभागी होते. भारताच्या या हल्ल्याबाबत आम्हाला आधीच गुप्तचर यंत्रणेने माहिती दिली होती. आमचे सशस्त्र दल २४ तास हायअलर्टवर होते. मातृभूमीच्या रक्षणासाठी आम्ही तयार आहोत. पहलगाम हल्ल्याची पारदर्शक चौकशी करण्याची आमची मागणी आहे असं त्यांनी म्हटलं.

तर भारताच्या हल्ल्यानंतरही पाकिस्तानने संयम बाळगला आहे असं विधान उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी केले. शहबाज शरीफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक घेतली. त्यात कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री आणि सर्व सैन्य दलाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पाकिस्तानी सैन्याला कारवाईसाठी मुभा दिली आहे. भारताने केलेल्या हल्ल्यात ३१ लोकांचा मृत्यू झाला असून ५७ जण जखमी आहेत. हल्ल्यानंतर पाकिस्तानातील विमान सेवा खंडीत करण्यात आली आहे. 

भारताच्या एअर स्ट्राईकनं पाकिस्तान घाबरला

नेहमीप्रमाणे आताही पाकिस्तानने त्यांच्या हद्दीत दहशतवादी सेंटर नसल्याचा दावा केला. पहलगाम हल्ल्याची जागतिक तपास यंत्रणेकडून चौकशी व्हावी अशी मागणी पाकिस्तानने केली. आम्हाला शांतता हवी असं विधान भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने दिले. भारताच्या सैन्य कारवाईनंतर काही तासांत पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी जर भारताने नरमाईची भूमिका घेतली तर दोन्ही देशातील तणाव कमी करण्यास आम्ही तयार आहोत असं विधान केले आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाindian air forceभारतीय हवाई दल