शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 07:40 IST

भारताने केलेल्या हल्ल्यात ३१ लोकांचा मृत्यू झाला असून ५७ जण जखमी आहेत. हल्ल्यानंतर पाकिस्तानातील विमान सेवा खंडीत करण्यात आली आहे. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतानेऑपरेशन सिंदूर हाती घेतले. यात भारतानेपाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद, लश्कर ए तय्यबा या संघटनेचे ९० हून अधिक दहशतवादी ठार झाले. भारताच्या या स्ट्राईकनंतर पाकिस्तानात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. त्यात पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी कांगावा करण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या ८० लढाऊ विमानांनी हा हल्ला केला असं शरीफ यांनी म्हटलं.

जनतेला संबोधित करताना पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले की, भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानी सैन्य तयार आहे. मंगळवारी रात्री झालेल्या हल्ल्यात भारताचे ८० लढाऊ विमान सहभागी होते. भारताच्या या हल्ल्याबाबत आम्हाला आधीच गुप्तचर यंत्रणेने माहिती दिली होती. आमचे सशस्त्र दल २४ तास हायअलर्टवर होते. मातृभूमीच्या रक्षणासाठी आम्ही तयार आहोत. पहलगाम हल्ल्याची पारदर्शक चौकशी करण्याची आमची मागणी आहे असं त्यांनी म्हटलं.

तर भारताच्या हल्ल्यानंतरही पाकिस्तानने संयम बाळगला आहे असं विधान उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी केले. शहबाज शरीफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक घेतली. त्यात कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री आणि सर्व सैन्य दलाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पाकिस्तानी सैन्याला कारवाईसाठी मुभा दिली आहे. भारताने केलेल्या हल्ल्यात ३१ लोकांचा मृत्यू झाला असून ५७ जण जखमी आहेत. हल्ल्यानंतर पाकिस्तानातील विमान सेवा खंडीत करण्यात आली आहे. 

भारताच्या एअर स्ट्राईकनं पाकिस्तान घाबरला

नेहमीप्रमाणे आताही पाकिस्तानने त्यांच्या हद्दीत दहशतवादी सेंटर नसल्याचा दावा केला. पहलगाम हल्ल्याची जागतिक तपास यंत्रणेकडून चौकशी व्हावी अशी मागणी पाकिस्तानने केली. आम्हाला शांतता हवी असं विधान भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने दिले. भारताच्या सैन्य कारवाईनंतर काही तासांत पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी जर भारताने नरमाईची भूमिका घेतली तर दोन्ही देशातील तणाव कमी करण्यास आम्ही तयार आहोत असं विधान केले आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाindian air forceभारतीय हवाई दल