शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 09:42 IST

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानातील हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. याठिकाणी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आलीत

नवी दिल्ली- ऑपरेशन सिंदूर हाती भारतीय सैन्याने पाकिस्तानवर स्ट्राईक केला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करून भारताने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. मात्र ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशात आणखी तणाव वाढला आहे. भारताने सीमाभागातील सर्व राज्यात सुरक्षा वाढवली आहे. त्याशिवाय दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांचा सपाटा सुरू आहे. पाकिस्ताननेही या हल्ल्यानंतर एलओसीवर सातत्याने गोळीबार सुरू केला आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धाचे सावट आहे. यातच बड्या देशांनी त्यांच्या नागरिकांना भारत-पाकिस्तानात प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.

अमेरिका, ब्रिटन यांनी मार्गदर्शक सूचना जारी करत भारत आणि पाकिस्तानातील भागात प्रवास करू नका असा सल्ला दिला आहे. लष्करी हालचाली आणि हवाई क्षेत्र बंदी या शीर्षकाखाली पाकिस्तानातील अमेरिकन दूतावासाने नागरिकांना सूचना दिल्या आहेत. दहशतवाद आणि सशस्त्र दलाच्या संघर्षाच्या शक्यतेमुळे भारत पाकिस्तान सीमेत आणि नियंत्रण रेषेच्या परिसरात अमेरिकन नागरिकांना प्रवास करू नका असं सांगण्यात आले आहे. 

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानातील हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. याठिकाणी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आलीत. त्यामुळे अमेरिकेच्या दूतावासाने अमेरिकन नागरिकांना "सुरू असलेल्या संघर्षाच्या परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा" असा सल्ला दिला आहे. अमेरिकेसह ब्रिटननेही त्यांच्या नागरिकांना भारत-पाकिस्तान सीमेपासून १० किमी आणि नियंत्रण रेषेच्या १६ किमी अंतरावर प्रवास करू नका असं सांगितले आहे. आम्ही सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. ब्रिटीश नागरिकांनी योग्य त्या सूचनांचे पालन करावे असं सांगण्यात आले आहे. चीननेही त्यांच्या नागरिकांना भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षात या दोन्ही देशात प्रवास टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

१०० हून अधिक दहशतवादी ठार

पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक माताभगिनींचे कुंकू (सिंदूर) त्या दिवशी पुसले गेले. कर्त्या माणसांवर दहशतवाद्यांनी घातलेल्या घाल्याने अवघा देश पेटून उठला. त्या कुंकवाची आण घेऊन भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे मंगळवारी मध्यरात्रीनंतर, बुधवारची पहाट उजाडत असताना  अवघ्या पंचवीस मिनिटांत पाकिस्तानातील नऊ ठिकाणचे दहशतवादी तळ क्षेपणास्त्रांचा मारा करीत उद्ध्वस्त केले, तसेच त्यातील १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या भीम पराक्रमानंतर देशवासीयांनी लष्कराला सलाम केला. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतAmericaअमेरिकाchinaचीन