शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
6
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
7
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
8
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
9
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
10
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
11
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
12
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
13
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
14
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
15
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
16
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
17
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
18
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
19
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन

Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 22:09 IST

Operation Sindoor 2.0: पाकिस्तानातील केवळ दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून भारत थांबणार नाही...

Operation Sindoor 2.0: भारताने दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानला दिलेला संदेश ही केवळ एक सुरुवात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी छावण्यांना लक्ष्य करून एअरस्ट्राईकची अचूकता दाखवून दिली. यामध्ये सुमारे १०० दहशतवादी मारले गेले. या हल्ल्याने पाकिस्तान चांगलाच हादरला. तरीही भारतीय लष्कराने म्हटले आहे की मिशन ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. यावरून हे स्पष्ट होते की पाकिस्तानवरील धोका अद्याप टळलेला नाही. कारण ऑपरेशन सिंदूर २.० मध्ये काहीही घडू शकते.

बलूच नागरिक, स्थानिक पोलीस पाक सरकारवर नाराज

भारत सध्या शांत आणि संयमी मनःस्थितीत आहे. भारताने राजकीयदृष्ट्या पाकिस्तानला एकटे पाडण्याचा योग्य तो प्लॅन केला आहे आणि अंंमलबजवाणीही सुरू आहे. त्यातच बलुच लोक पाकिस्तान सरकारवर अजिबात खूश नाहीत. एवढेच नाही तर तेथील स्थानिक पोलिसही सरकार आणि लष्कराच्या कृतींवर नाराज आहेत. अशा परिस्थितीत, पाकिस्तानमध्ये अंतर्गत कलह तीव्र होऊन पाकिस्तानची आणखी दोन भागांत फाळणी करण्याची भारताकडे सुवर्णसंधी आहे. यामुळे जगाला एक मजबूत संदेश जाईल की जर कोणत्याही देशाने भारताशी पंगा घेतला, तर भारतीय सैन्यातील प्रत्येक सैनिक शत्रूसाठी काळ बनून अंगावर चाल करेल.

ऑपरेशन सिंदूर २.० मध्ये काय होईल?

बलुचिस्तान हा पाकिस्तानसाठी 'दुखरी नस' आहे. पाकिस्तान सरकार याबाबत शक्य तितके मौन बाळगतो. असे मानले जाते की ऑपरेशन सिंदूर २.० मध्ये भारत पाकिस्तानला बलूचिस्तान वेगळे करण्यास भाग पाडायाला लावून त्रास देऊ शकतो. ऑपरेशन सिंदूर २.० मध्ये भारत १९७१ च्या युद्धाप्रमाणे बलुचिस्तानला वेगळे करण्याची योजना आखू शकतो. यामुळे संपूर्ण जगाला भारताची शक्ती कळेल. असे घडल्यास केवळ पाकिस्तानच नव्हे तर त्यांना पाठिंबा देणारे चीन आणि तुर्कस्थानलाही संदेश जाईल.

एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तानची पळापळ

आज झालेला ऑपरेशन सिंदूर हा केवळ एक ट्रेलर असल्याचे मानले जात आहे. त्याचवेळी, भारताने हे स्पष्ट केले आहे की दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांसाठी कोणतीही हयगय बाळगली जाणार नाही. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्येही भीतीचे वातावरण आहे. पंजाब प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आजच्या एअरस्ट्राईकला 'युद्धासाठीची चिथावणी' म्हटले आहे आणि प्रत्युत्तर देण्याबद्दल दर्पोक्तीही केली आहे. पण लष्करप्रमुख मुनीर अजूनही गप्प आहेत. त्यामुळे भारताच्या या कृतीतून पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वावरचा दबाव स्पष्टपणे दिसून येतो.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत