शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 22:09 IST

Operation Sindoor 2.0: पाकिस्तानातील केवळ दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून भारत थांबणार नाही...

Operation Sindoor 2.0: भारताने दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानला दिलेला संदेश ही केवळ एक सुरुवात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी छावण्यांना लक्ष्य करून एअरस्ट्राईकची अचूकता दाखवून दिली. यामध्ये सुमारे १०० दहशतवादी मारले गेले. या हल्ल्याने पाकिस्तान चांगलाच हादरला. तरीही भारतीय लष्कराने म्हटले आहे की मिशन ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. यावरून हे स्पष्ट होते की पाकिस्तानवरील धोका अद्याप टळलेला नाही. कारण ऑपरेशन सिंदूर २.० मध्ये काहीही घडू शकते.

बलूच नागरिक, स्थानिक पोलीस पाक सरकारवर नाराज

भारत सध्या शांत आणि संयमी मनःस्थितीत आहे. भारताने राजकीयदृष्ट्या पाकिस्तानला एकटे पाडण्याचा योग्य तो प्लॅन केला आहे आणि अंंमलबजवाणीही सुरू आहे. त्यातच बलुच लोक पाकिस्तान सरकारवर अजिबात खूश नाहीत. एवढेच नाही तर तेथील स्थानिक पोलिसही सरकार आणि लष्कराच्या कृतींवर नाराज आहेत. अशा परिस्थितीत, पाकिस्तानमध्ये अंतर्गत कलह तीव्र होऊन पाकिस्तानची आणखी दोन भागांत फाळणी करण्याची भारताकडे सुवर्णसंधी आहे. यामुळे जगाला एक मजबूत संदेश जाईल की जर कोणत्याही देशाने भारताशी पंगा घेतला, तर भारतीय सैन्यातील प्रत्येक सैनिक शत्रूसाठी काळ बनून अंगावर चाल करेल.

ऑपरेशन सिंदूर २.० मध्ये काय होईल?

बलुचिस्तान हा पाकिस्तानसाठी 'दुखरी नस' आहे. पाकिस्तान सरकार याबाबत शक्य तितके मौन बाळगतो. असे मानले जाते की ऑपरेशन सिंदूर २.० मध्ये भारत पाकिस्तानला बलूचिस्तान वेगळे करण्यास भाग पाडायाला लावून त्रास देऊ शकतो. ऑपरेशन सिंदूर २.० मध्ये भारत १९७१ च्या युद्धाप्रमाणे बलुचिस्तानला वेगळे करण्याची योजना आखू शकतो. यामुळे संपूर्ण जगाला भारताची शक्ती कळेल. असे घडल्यास केवळ पाकिस्तानच नव्हे तर त्यांना पाठिंबा देणारे चीन आणि तुर्कस्थानलाही संदेश जाईल.

एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तानची पळापळ

आज झालेला ऑपरेशन सिंदूर हा केवळ एक ट्रेलर असल्याचे मानले जात आहे. त्याचवेळी, भारताने हे स्पष्ट केले आहे की दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांसाठी कोणतीही हयगय बाळगली जाणार नाही. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्येही भीतीचे वातावरण आहे. पंजाब प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आजच्या एअरस्ट्राईकला 'युद्धासाठीची चिथावणी' म्हटले आहे आणि प्रत्युत्तर देण्याबद्दल दर्पोक्तीही केली आहे. पण लष्करप्रमुख मुनीर अजूनही गप्प आहेत. त्यामुळे भारताच्या या कृतीतून पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वावरचा दबाव स्पष्टपणे दिसून येतो.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत