शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 22:09 IST

Operation Sindoor 2.0: पाकिस्तानातील केवळ दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून भारत थांबणार नाही...

Operation Sindoor 2.0: भारताने दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानला दिलेला संदेश ही केवळ एक सुरुवात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी छावण्यांना लक्ष्य करून एअरस्ट्राईकची अचूकता दाखवून दिली. यामध्ये सुमारे १०० दहशतवादी मारले गेले. या हल्ल्याने पाकिस्तान चांगलाच हादरला. तरीही भारतीय लष्कराने म्हटले आहे की मिशन ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. यावरून हे स्पष्ट होते की पाकिस्तानवरील धोका अद्याप टळलेला नाही. कारण ऑपरेशन सिंदूर २.० मध्ये काहीही घडू शकते.

बलूच नागरिक, स्थानिक पोलीस पाक सरकारवर नाराज

भारत सध्या शांत आणि संयमी मनःस्थितीत आहे. भारताने राजकीयदृष्ट्या पाकिस्तानला एकटे पाडण्याचा योग्य तो प्लॅन केला आहे आणि अंंमलबजवाणीही सुरू आहे. त्यातच बलुच लोक पाकिस्तान सरकारवर अजिबात खूश नाहीत. एवढेच नाही तर तेथील स्थानिक पोलिसही सरकार आणि लष्कराच्या कृतींवर नाराज आहेत. अशा परिस्थितीत, पाकिस्तानमध्ये अंतर्गत कलह तीव्र होऊन पाकिस्तानची आणखी दोन भागांत फाळणी करण्याची भारताकडे सुवर्णसंधी आहे. यामुळे जगाला एक मजबूत संदेश जाईल की जर कोणत्याही देशाने भारताशी पंगा घेतला, तर भारतीय सैन्यातील प्रत्येक सैनिक शत्रूसाठी काळ बनून अंगावर चाल करेल.

ऑपरेशन सिंदूर २.० मध्ये काय होईल?

बलुचिस्तान हा पाकिस्तानसाठी 'दुखरी नस' आहे. पाकिस्तान सरकार याबाबत शक्य तितके मौन बाळगतो. असे मानले जाते की ऑपरेशन सिंदूर २.० मध्ये भारत पाकिस्तानला बलूचिस्तान वेगळे करण्यास भाग पाडायाला लावून त्रास देऊ शकतो. ऑपरेशन सिंदूर २.० मध्ये भारत १९७१ च्या युद्धाप्रमाणे बलुचिस्तानला वेगळे करण्याची योजना आखू शकतो. यामुळे संपूर्ण जगाला भारताची शक्ती कळेल. असे घडल्यास केवळ पाकिस्तानच नव्हे तर त्यांना पाठिंबा देणारे चीन आणि तुर्कस्थानलाही संदेश जाईल.

एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तानची पळापळ

आज झालेला ऑपरेशन सिंदूर हा केवळ एक ट्रेलर असल्याचे मानले जात आहे. त्याचवेळी, भारताने हे स्पष्ट केले आहे की दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांसाठी कोणतीही हयगय बाळगली जाणार नाही. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्येही भीतीचे वातावरण आहे. पंजाब प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आजच्या एअरस्ट्राईकला 'युद्धासाठीची चिथावणी' म्हटले आहे आणि प्रत्युत्तर देण्याबद्दल दर्पोक्तीही केली आहे. पण लष्करप्रमुख मुनीर अजूनही गप्प आहेत. त्यामुळे भारताच्या या कृतीतून पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वावरचा दबाव स्पष्टपणे दिसून येतो.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत