शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

बांगलादेशवर एनआरसीचा परिणाम नाही, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 6:10 AM

राष्ट्रीय नागरिकत्व सूची (एनआरसी) अद्ययावत करण्याची प्रक्रिया ही संपूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय असून त्याचा बांगलादेशच्या लोकांवर कोणताही परिणाम होणार नाही,

ढाका : राष्ट्रीय नागरिकत्व सूची (एनआरसी) अद्ययावत करण्याची प्रक्रिया ही संपूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय असून त्याचा बांगलादेशच्या लोकांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे आश्वासन सोमवारी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी बांगलादेशला दिले.गेल्या वर्षी भारतीय संसदेने नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन आणि गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी भारताचा डिसेंबरमध्ये होणारा दौरा रद्द केला होता. आसाममध्ये एनआरसी उपलब्ध केल्यानंतर बांगलादेशने उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे भारताने एनआरसीचा विषय हा पूर्णपणे आमचा अंतर्गत असल्याचे त्याला कळवले होते.नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक (सीएबी) आणि एनआरसी संमत झाल्यानंतर शेजारच्या देशाला भेट देणारे शृंगला हे पहिलेच अत्यंत वरिष्ठ भारतीय अधिकारी आहेत. सीएएनुसार भारत काही बांगलादेशी स्थलांतरितांना देशात पाठवू शकेल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यांतर बांगलादेशने काळजी व्यक्त केली होती. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी एनआरसीचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेल्या सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्कमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेत उपस्थित केलाहोता. (वृत्तसंस्था)>हा तर भारताचा अंतर्गत विषयएनआरसी अद्ययावत करणे ही प्रक्रिया पूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय असल्याचे शृंगला यांनी म्हटले. एनआरसीमुळे बांगलादेशचे लोक आणि बांगलादेशवर कोणताही विपरीत परिणाम होणार नसल्याचे आश्वासन शृंगला यांनी ‘बांगलादेश अँड इंडिया : ए प्रॉमिसिंग फ्युचर’ चर्चासत्रात बोलताना सांगितले. शृंगला ढाकामध्ये भारताचे उच्चायुक्त होते.

टॅग्स :National Register of Citizensएनआरसी