शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

श्रीलंका हल्ल्यामागे काश्मीर कनेक्शन; प्रशिक्षण घेतल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 3:29 PM

भारतात दहशतवाद्यांनी जाण्यामागच्या उद्देशाबाबत आपल्याला पूर्ण माहिती नसल्याचेही सांगितले.

कोलंबो : दोन आठवड्यांपूर्वी श्रीलंकेतील चर्च आणि हॉटेलांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये प्रशिक्षण देण्यात आल्याचा दावा श्रीलंकेच्या सेना प्रमुखांनी केला आहे. याचबरोबर हे दहशतवादी बंगळुरु आणि केरळच्या काही भागातही जाऊन आल्याचे लेफ्टनंट जनरल महेश सेनानायके यांनी सांगितले. यावर भारताने खुलासा करताना या दहशतवाद्यांचे भारतात आल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचे म्हटले आहे.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा दावा केला आहे. भारतात दहशतवाद्यांनी जाण्यामागच्या उद्देशाबाबत आपल्याला पूर्ण माहिती नसल्याचेही सांगितले. मात्र, ते कशाचेतरी प्रशिक्षण किंवा दुसऱ्या दहशतवादी संघटनांशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्नशील होते. तसेच दहशतवाद्यांनी घडविलेल्या स्फोटांवरून हा कट स्थानिक नसून बाहेरील शक्तींची मदत आहे. 

21 एप्रिलला झालेल्या 8 साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 253 लोक मारले गेले होते. यामध्ये 10 भारतीयांसह 39 विदेशी नागरिकही होते. भारताकडून हल्ल्य़ाची माहिती मिळूनही सुरक्षा करण्यात अपयश आले. आमच्या सैन्याने वेगळ्याच दिशेने तपास केला. मात्र, यासाठी कोणाला दोषी ठरवता येणार नसल्याचे सेनानायके म्हणाले. 

यापुढे मदरशांना सरकार नियंत्रित करणार आहे. याबाबत कोमताही वाद नको म्हणून रानील विक्रमसिंघे यांनीच हा निर्णय घेतला आहे. जे धर्मगुरु टुरिस्ट व्हिसावर मदरशांमध्ये कार्यरत होते त्यांना मायदेशी पाठवून देण्यात येणार आहे. दहशतवादी लपलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्फोटके सापडली असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आयएसचे झेंडे, लष्कराचा गणवेश, सुसाईड जॅकेट, 150 जिलेटिन कांड्या आणि ड्रोन कॅमेरे सापडल्याचे सेनानायके यांनी सांगितले.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाBombsस्फोटकेBlastस्फोट