शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

सुरक्षा परिषदेत भारताची पाकवर टीका; दहशतवाद्यांचे अर्थसाहाय्य रोखण्याच्या प्रस्तावाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 2:34 AM

अतिरेक्यांचे समर्थन करणारे देश आपल्या कारवाईला आणि निष्क्रियतेला योग्य ठरवीत दहशतवाद्यांना आश्रय देत राहतील आणि काही सबबी सांगत राहतील, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानवर टीका केली आहे.

संयुक्त राष्ट्रे : अतिरेक्यांचे समर्थन करणारे देश आपल्या कारवाईला आणि निष्क्रियतेला योग्य ठरवीत दहशतवाद्यांना आश्रय देत राहतील आणि काही सबबी सांगत राहतील, अशा शब्दांत भारतानेपाकिस्तानवर टीका केली आहे.संयुक्त राष्ट्रांकडून प्रतिबंधित अतिरेकी आणि संस्थांविरुद्ध निर्बंध सक्तीने लागू करण्याचे आवाहनही भारताने सुरक्षा परिषदेकडे केले आहे. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी यावेळी पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीकाही केली.सुरक्षा परिषदेने गुरुवारी सर्वसहमतीने एक प्रस्ताव स्वीकार केला आहे. यात सदस्य देशांना अतिरेकी कार्यासाठी अर्थसाहाय्य रोखण्यासाठी प्रयत्न वाढविण्याबाबत सांगण्यात आले आहे.भारताने याबाबतचा प्रस्ताव स्वीकार केल्याच्या कृतीचे स्वागत करताना म्हटले आहे की, दहशतवादाविरुद्धच्या प्रयत्नात हा मैलाचा दगड ठरेल. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी याबाबतच्या खुल्या चर्चेत भाग घेताना म्हटले आहे की, दहशतवाद्यांची आर्थिक रसद रोखण्यासाठी प्रयत्न करण्याच्या प्रस्तावाचे भारत स्वागत करीत आहे.भारताने पाकिस्तानचा अप्रत्यक्ष उल्लेख करीत म्हटले आहे की, दुर्दैवाने वस्तुस्थिती ही आहे की, दहशतवाद्यांचे समर्थन करणारे देश आपली कारवाई आणि निष्क्रियता योग्य ठरविण्यासाठी दहशतवाद्यांना आश्रय देत राहतील. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या राजदूत मलिहा लोधी यांनी यावेळी मत व्यक्त करीत जम्मू-काश्मीरचा उल्लेख केला.

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतPakistanपाकिस्तान